बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी...
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत सन 23 24 च्या खरीप आणि रब्बीच्या हंगामातील 453 कोटी रुपयांपैकी 429 कोटी रुपयांच वितरण शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे उर्वरित 24 कोटी रुपये तांत्रिक कारणामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नव्हते त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे तर 24 25 हंगामातील पिक विम्याचे 144 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहेत तर उर्वरित निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांना आज झालेल्या दिशा समितीच्या बैठकीत दिली.बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समितीच्या सभागृहात केंद्र पुरस्कृत योजनेचा आढावा केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आज 29 एप्रील रोजी घेण्यात आला यावेळी प्रधानमंत्री पिक विमा योजनेची स्थिती मंत्री महोदयांनी जाणून घेतली त्यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी 23 24 वर्षात खरीप आणि रब्बी हंगामा अंतर्गत बुलढाणा जिल्ह्यातील 4 लाख 50 हजार शेतकऱ्यांना 453 कोटी रुपयांचा पिक विमा रक्कम मंजूर झाला होता त्यातील 429 कोटी रुपयांचं वाटप करण्यात आला उर्वरीत 24 कोटी रुपये शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक व इतर कारणांमुळे जमा झाले नव्हते ते पैसेही आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे शिवाय सन 24-25 खरीप हंगामात 144 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले असून उर्वरीत शेतकऱ्यांच्या खात्यात ही पिक पैसे जमा होणार आहे अशी माहिती ही यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे यांनी दिली