शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन...


 
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे तहसीलदारांना निवेदन...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जळगावला पक्षाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन यांना शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात दिनांक २९ मे रोजी तहसीलदार साहेब यांच्या मार्फत निवेदन सादर केले.मागील वर्षी जळगाव जामोद तालुक्यामध्ये सततच्या पावसाने व गारपीट मुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान झाले शासनाने सदर नुकसानीचे पंचनामे करून पात्र शेतकऱ्यांची यादी बनवलेली असताना सुद्धा बहुसंख्य शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्याचबरोबर समोर येऊन ठेपलेल्या खरीप हंगामाच्या अनुषंगाने अद्याप पर्यंत शासन स्तरावर कोणतीही तयारी दिसून येत नाही कृषी कार्यालय नुसते ठेकेदार पाळण्यात मग्न झाले असून शेतकरी बांधवांसाठी लागणारे बी- बियाणे खते याची उपलब्धता अद्याप पर्यंत झालेली दिसून येत नाही इथे यावर्षी मान्सून नियोजित वेळेच्या आधी दाखल झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठीचे योग्य मार्गदर्शन हवामानाचा अंदाज शासनाची अद्याप कोणतीही तयारी झालेली दिसून येत नाही आणि शेतकरी बांधवांना बँकेमध्ये सततच्या चकरा मारावे लागत असून त्यांचे पीक कर्जाचे प्रकरण निकाली लागत नसून त्यांच्या हक्काचे अनुदानाची विम्याचे पैसे कर्ज खात्यामध्ये बँक जमा करीत आहे हे पैसे जमाना करता त्यांना त्वरित अदा करण्यात यावी. शेतकरी बांधवांच्या शेतमालाला भाव नसल्यामुळे व शेतीला  लागणारे साहित्याचे भाव गगनाला भिडल्यामुळे व मिळालेल्या मिळकतीतून स्वतःचा संसार चालवणे ही कठीण झाले असून पुढील हंगामासाठी लागणाऱ्या शेतीचा खर्च करणे जिकरीचे झालेले आहे तरी प्रलंबित पीक कर्जाला माफी देऊन नवीन पीक कर्ज तातडीने उपलब्ध करून द्यावे अशा प्रकारची विनंती होता निवेदन मुख्यमंत्री यांना सादर केले सदर मागण्या येत्या आठ दिवसात जर पूर्णत्वास नेल्या नाही तर पक्षातर्फे तहसील कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचा ही इशारा या प्रसंगी प्रशासनाला देण्यात आला सदर निवेदन देण्यासाठी तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर, जिल्हा काँग्रेस कमिटीचे प्रभारी अध्यक्ष प्रकाशभाऊ पाटील, पक्षनेते स्वातीताई वाकेकर, प्रदेश सदस्य ज्योतीताई ढोकणे,  भाऊराव भालेराव, जुबेर पटेल, अमर पाचपोर, श्रीकृष्ण केदार, प्रवीण भोपळे, ज्ञानेश वानखडे, सुनील कळस्कर, सचिन जाधव, अजय ताठे, विजय सातव, भाऊराव वरखेडे, अनंता झालटे अझहर देशमुख, मयूर राऊत, अमित जाधव राधेश्याम खरात, गणेश बाठे, अनिल इंगळे आणि निलेश निकम सह बऱ्याच महिला व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post