![]() |
भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील भवानीनगर मधिल रानात चरायला गेल्या बकऱ्या घरी परतत असताना त्यांच्यासोबत एक हरण देखील गावात पोहोचले होते ही बाब लक्षात येताच हरिण वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने पुन्हा जंगलामध्ये सोडण्यात आले आहे.वरणगाव लगतच असलेल्या आयुध निर्माणी परिसराला लागून जंगल आहे या जंगलात हरिण सांबर तरसे मोर रानटी डुकरे यांच्यासारखे वन्य प्राण्यांचा कळप मोठ्या प्रमाणात आहेत त्यातील एक हरण गावात परतणार्या शेळ्या सोबत भवानीनगर येथे येऊन पोहोचले मनुष्य प्राणी पाहिल्यावर सैरभैर होऊन ते एकाच्या घरात घुसले त्याच्या पायाला व तोंडाला खर्चटले होते यावेळी भवानी नगरमधील राजेंद्र भाऊ विश्वनाथ चौधरी दीपक भाऊ मराठे व तरुणांनी त्याला पकडून त्याला प्राथमिक उपचार केले यादरम्यान वनपाल ललित गवळी यांना कळविण्यात आले त्यांनी लगेचच भवानीनगर गाठून मालवाहू वाहनाने जंगलामध्ये सुरक्षित स्थळी हरणाला सोडून दिले आहे