वरणगाव प्रतिनिधी :-सुनील पाचपोळ
भुसावळ तालुक्यातील काहूरखेडा शिवारामध्ये गोवंश जातीच्या जनावरांची अवैद्य वाहतूक करणारा कंटेनर अपघातग्रस्त झाल्यामुळे काहूरखेडा शिवारातील नागरिकांना गोवंश जातीच्या जनावरांची ची अवैध वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनास आले, या कंटेनर मध्ये पंधरा ते वीस जनावरे होती, त्यापैकी पाच ते सहा जनावरांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास मध्यप्रदेश मधून मालेगाव कडे गोवंश जातीच्या पंधरा ते वीस जनावराला घेऊन जाणारा कंटेनर हा काहूरखेडा शिवारामध्ये अपघात ग्रस्त झाला स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी वरणगाव पोलिसांना तात्काळ माहिती दिली व वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप कुमार बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत एका आरोपीस ताब्यात घेतले आहे व सदर गोवंशाची जातीच्या जनावरांना जळगाव येथे गोशाळेमध्ये पाठवले गेले आहे यामध्ये पाच ते सहा जनावरांचा गुदमरून मृत्यू झाला आहे सदर घटनेचा पुढील तपास वरणगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी करत आहेत या ठिकाणी गोरक्षक गुड्डू बडे श्रीराम भाई पैलवान ललित पटेल भारत चंदने बाळा धनगर विनोद भोई यांनी सहकार्य केले.