पूल बंद झाल्याने अपघातामध्ये वाढ..


राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी.

चिखलदरा तालुक्यातील जामली व चिंचखेडा दरम्यान असलेली एक कुंडी खोऱ्यातून येणारी कुंडीनदी आहे, ती शहानूर नदीला जाऊन मिळते.धारणी परतवाडा जामली मार्गावर या नदीवर व गोटाळी फाट्यासमोरील नाल्यावरही पूल असून  त्यापूलाला पाईप लावले आहेत.अतिवृष्टी झाल्यावर पुरामध्ये लाकूड दगड धोंडे वाहून येऊन त्या पाईप मध्ये अडकल्याने पूर्ण पाईप चोकप झाले आहे.परिणामी पुलाच्या वरून पाणी जात असल्याने पूर्ण रस्ता शेवाळला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात या पुलान्वर अपघात होत आहेत.कित्येक दुचाकीस्वार या पुलावर आदळल्याने जख्मी झाले आहेत.नदीला पूर असल्यावर दिवसभर वाहतूक ठप्प राहते. त्यामुळे वाहणांच्या रांगा लागतात. वाहतुकीची कोंडी होते. धारणी परतवाडा परसापूर ला जोडणारा एकमेव मार्ग असल्याने नागरिकांची अनेक कामे खोळंबली जातात.म्हणून या कुंडी नदीवर व गोटाळी फाट्यापुढील नाल्यावर त्वरित उंच पूल बनवण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

Previous Post Next Post