बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी:-
काश्मीर घाटी मध्ये गेल्या आठवडा भरापासून हिंदूंना टार्गेट करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या या घटनेच्या निषेधार्त बजरंग दल कडून आज देशभर विरोध प्रदर्शन व निषेध नोंदविण्यात आला, त्याच प्रमाणे बजरंग दल संग्रामपूर शहर तहसिल कार्यालया समोर आतंकवादी चा पुतळा दहन करण्यात आला व तहसीलदार यांच्या मार्फत देशाचे महामहिम राष्ट्रपती याना निवेदन देण्यात आले काश्मीर मध्ये होत असलेले अत्याचार त्वरित थांबावे व या आतंकवादी यांच्या वर कार्यवाही करून कंठस्नान घालावे , अशी मागणी करण्यात आली, काश्मीर मध्ये हत्या करण्यात आलेल्या परिवाराचा पाठी मागे देशातील प्रत्येक बजरंग दल कार्यकर्ता कणखर पणे उभा आहे, असे प्रखंड मंत्री भीमाशंकर कातव
यावेळी बोलले त्यावेळी प्रखंड संयोजक भारत बावस्कर ,राधिका खेडकर, जिल्हा संयोजिका ऋषी कोकाटे,प्रमोद साबळे, गोपाल परिसे, शिवा वानखेडे ,दीपक बोपाचे ,सचिन जाधव, संदीप सोलंके, अभिजित शिरसोले, माधव भोपळे,वैभव इंगळे ,पीयूष रामनकार,देवा ठोंबरे,आशिष सायखडे यांसह असंख्य बजरंग दलाचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.