काश्मीर घाटी मध्ये गेल्या आठवडा भरापासून हिंदूंना टार्गेट करून त्यांच्या हत्या करण्यात आल्या या घटनेच्या निषेधार्त बजरंग दलाकडून दिनांक ९ आक्टोंबर रोजी संपूर्ण देशभर विरोध प्रदर्शन व निषेध नोंदविण्यात आला, त्याच प्रमाणे बजरंग दल जळगाव जामोद शहर व तालुका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालया समोर आतंकवाद्यांचा बजरंग दलातर्फे पुतळा दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु पोलीस प्रशासनाकडून त्यांना डिटेन करण्यात आले काश्मीर मध्ये होत असलेले अत्याचार केंद्र सरकारने त्वरित थांबावे व या आतंकवाद्या वर कार्यवाही करून त्यांना कंठस्नान घालावे , अशी मागणी बजरंग दल जळगांव जामोद तालुक्याच्या वतीने करण्यात आली, काश्मीर मध्ये हत्या करण्यात आलेल्या परिवाराच्या पाठीमागे देशभरातील प्रत्येक बजरंग दलाचा कार्यकर्ता कणखर पणे उभा आहे, असे जिल्हा संयोजक नदु दलाल यावेळी बोलले. काश्मीर मध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करण्याकरिता जळगाव जामोद येथे विहिंप चे विभागमंत्री उद्धवभाऊ सातव विहिंप तालुका अध्यक्ष रवी बानाईत बजरंग दल तालुका संयोजक नानुभाऊ कराळे, जिल्हा विद्यार्थी प्रमुख ऋषी येउल, नगर मंत्री सचिन कपले, नगर संयोजक सागर ढगे प्रतिभा ताई राखोंडे जिल्हा संयोजिका शीलाताई बोचरे पवन उपाधे अमोल काळपांडे सुनील कुवारे शुभम उमाळे वैभव भोलतकार हरिदास झळते वैभव भगत यांसह असंख्य बजरंग दल कार्यकर्ते उपस्थित होते
काश्मीर मध्ये हत्या करण्यात आलेल्या परिवाराच्या पाठीमागे देशातील प्रत्येक बजरंग दलाचा कार्यकर्ता कणखरपणे उभा.- जिल्हा संयोजक नंदु दलाल..
जळगांव जा.प्रतिनिधी:-सचिन कपले.