जामोद येथे पत्रकार दिनानिमित्त करण्यात आला पत्रकार बांधवांचा सन्मान. मतदार संघामध्ये रोजगार निर्मितीसाठी व उद्योग वाढवण्याकरिता प्रयत्न करावेत-डॉ. स्वातीताई वाकेकर..


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जामोद येथे मोहन जयस्वाल व समाधान दामधर यांच्या पुढाकाराणे जामोद येथे पत्रकार दिनाचे औचित्य साधून  तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला असता,  यावेळी बोलतांना काँग्रेस पक्ष नेत्या डॉ. स्वातीताई वाकेकर यांनी रोजगार निर्मितीच्या प्रकल्प उभारणीकरिता व बचत गट, छोटे उद्योग यामधून रोजगार निर्मिती व उद्योजकता वाढवण्याचे प्रयत्न व्हावेत व या कार्यात पत्रकार बांधवांनी  आपल्या लेखनीतुन सहकार्य करावे असे मत  यांनी व्यक्त केले.या कार्यक्रमाच्या प्रस्तावनपर विचार व्यक्त करतांना - समाधान दामधर यांनी जळगाव जामोद परिसरात रोजगार निर्मिती व सध्याची बेरोजगारी याकडे पत्रकार बंधुंनी विशेष लक्ष देण्याची व जनतेचे प्रबोधन करण्याची गरज असल्याचे संबोधित केले. हा कार्यक्रम  सखारामजी धुरडे   यांच्या शेतात पार पडला.सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेले व पूर्ण मायेचा आशीर्वाद लाभलेल्या जळगाव जामोद मतदारसंघात विविध कृषी व पर्यटन आधारित प्रकल्प स्थापना करण्या करिता वाव आहे असे मत पत्रकार विजय पोहनकर यांनी मनोगतात व्यक्त केले , कैलास देशमुख यांनी विचार व्यक्त केले .  आभार प्रदर्शन करतांना मोहन जयस्वाल यांनी राष्ट्र व समाजाच्या उत्थानासाठी सदोदित कार्यरत पत्रकारांच्या कार्य कर्तृत्वाचा सन्मान करणे आपले आद्यकर्तव्य असल्याचे सांगितले. कार्यक्रमास जळगाव जामोद परिसरातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी, नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड: ज्योतीताई ढोकणे, प्रमुख उपस्थितीत जळगाव जामोद मतदारसंघ काँग्रेस पक्षनेत्या डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर,  प्रमुख मार्गदर्शक कैलास बापू देशमुख अ.भा.ग्राणीण पत्रकार संघ प्रदेश अध्यक्ष ,  अभिमन्यूजी भगत तसेच काँग्रेस किसान आघाडी जिल्हाध्यक्ष  राजु पाटील, जिल्हा सरचिटणीस अच्छे खा , तालुका अध्यक्ष अविनाशभाऊ उमरकर, डॉ संदीप वाकेकर,  अर्जुन  घोलप , श्रीकृष्ण केदार, डॉ. राजपूत,राजकुमारसिंह राजपुत, एम. असिफ इक्बाल, अन्सार बाबु ,  प्रवीण भोपळे, ॲड: संदिप मानकर, राजु  सित्रे पाटील , कैलास  बोडखे, नारायण दामधर,  उपसरपंच सलाम खा जहांगीर खा, बाळू बांधिरकर, , श्याम  पालीवाल, वसंत धुरडे, डॉ. कपले, दिनेश ढगे, रामकृष्ण धुळे, महादेव गवई, विकास धुळे, महादेव भगत, सुनील भगत, किशोर धुळे, शेषराव सातपुते, दीपक राजपूत, दिनेश काटकर , भिकाजी कपले, पुंडलिक ढगे, गौतम गवई, उकर्डा सोळंके, नसिर खान पठाण, सुभाष ढगे, अशोक धरमे, अनिल अनोकार, विश्‍वनाथ बोडखे, केशव काळपांडे, देविदास केदार, भगवान दलाल, रमेश भगत, समाधान भगत, रोशन सपकाळ, अमोल भगत, सुनील धुरडे, भास्कर काळपांडे, सुनील दामधर, राजू  ढगे,  भास्कर हिस्सल, विजय भोंडे , हाजी मोहम्मद याकुब,  शेख शब्बीर शेख समद, सय्यद साबिर सय्यद बशीर ,शेख इरफान शेख लोकमान, मोहम्मद युसुफ मोहम्मद याकुब,महमूद खान  ,शेख सलीम शेमजीद, नजाकत हुसेन ,बब्बुशेठ दातून वाले,  साबीर मुल्लाजी, शे. मुक्तार , विजय भोंडे, अरुण हिस्सल, गजानन बोडखे, सुनील रौंदळे, सागर बोडखे, रमेश धुरडे, मोहन दामधर, अमोल हिस्सल, प्रकाश बोडखे व प्रेम जयस्वाल यांच्यासह तालुक्यातील पत्रकार अभिमन्यू भगत, कैलासबापू देशमुख , डॉ: गुलाबराव इंगळे,राजेश बाठे, जयदेव वानखडे , वासुदेव राजनकर , विनोद चिपडे ,विजय पोहनकर, राजेश लहासे, शमीमबापू देशमुख,राजु वाढे , विनोद वानखडे, प्रदिप बोबडे,अनिल भगत, शिवदास सोनवणे, गजानन सोनटक्के, गणेश भड, विठ्ठल गावंडे, अमोल भगत, दत्तु दांडगे, गोपाल अवचार, सागर झनके, अश्विन राजपूत , अर्षद इक्बाल ,  राजकुमार भड, संतोष मांजरे,  भीमराव पाटील, गोपाल मनोहर अवचार, वैभव वानखडे, राहुल निर्मळ, नितीन कपले, गणेश गिऱ्हे ,आकाश उमाळे यांच्यासह बहुसंख्य पत्रकारांची उपस्थिती होती.

Previous Post Next Post