दोन विद्यार्थ्यांचा विदृपा नदीतील खोल खड्ड्यात बुडून मृत्यु..


तेल्हारा प्रतिनिधी :- संघपाल गवारगुरू

तेल्हारा तालुक्यातील  ग्राम मनब्दा येथील दोन १४ वर्षीय शाळकरी मुले व एक अंदाजे १२ वर्षीय मुलगा आज रविवार असल्यामुळे गावाच्या लगतच असलेल्या अटकळी मनब्दा रोडवर विदृपा नदीत जलयुक्त शिवारासाठी खोल केलेल्या नदीपात्रात अंघोळीसाठी उतरले पण त्या चिमुकल्याना पाण्याचा अंदाज न आल्याने शिवाय, त्यांना काय माहिती की त्या खड्ड्यात जवळपास १५ते २० फूट पाणी आहे त्या तिघांपैकी दोघांनाही पोहता देखील येत नसताना देखील पाणी पाहून त्यांना अंघोळीचा मोह आवराला नाही आणि अशातच दोघांनीही पाण्यात उड्या घेतल्या व तिसरा त्यांच्यापैकी जो लहान होता तो गंमत पाहत होता बराच वेळ झाला तरी मुले बाहेर येत नाही हे पाहून लहान मुलगा गावाकडे धावत गेला व गावात बातमी सांगितली लगेच गावकरी त्या जलाशयाकडे धावत सुटले परंतु तोपर्यंत खूप वेळ झाला होता, दोघांच्याही आईने एकच टाहो फोडला. त्यांचा तो आकांत पाहून उपस्थितांचे डोळे पाणवले, तेल्हारा पोलीस स्टेशनला जशी माहिती मिळाली तशी क्षणाचाही विलंब न करता पोलीस कर्मचारी घटना स्थळी पोहचले स्थळ पंचनामा करून शव उत्तरीय तपासणी साठी तेल्हारा ग्रामीण रुग्णालयात पाठवले. विशेष म्हणजे दोन्हीही मुले भूमिहीन शेतमजूराची मुले असल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Previous Post Next Post