प्रत्येक ठिकाणी असे ऐकायला मिळतो आमची या गावात शाळा सुरू आहे. व आमच्या शाळेत शिक्षण घेणारी मुले मुली पाहीजे. कोणी तर शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आई बाबाला संस्था चालवण्याकरता पैसे देऊन मुले शाळेत घेउन जात असल्याचे प्रकार ऐकण्यात आले.त्याच प्रमाणे चिखलदरा तालुक्यातील मोरगड येथे डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम निवासी आश्रमशाळा तिन महिने अगोदर सुरू करण्यात आली आहे. या शाळेला शाळा सुरू करण्यासाठी कशाही प्रकारचा पत्र नसुन ही शाळा कशी काय सुरू करण्यात आले हा मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे.तसेच या शाळेत सहा ते नऊ असे चार वर्ग सुरू असुन येथील मुलाची पट संख्या फक्त १७ ऐवढी आहे.तसेच नियमानुसार ज्या गावात अगोदरच शाळा असेल तर अशा गावा पासुन पाच किमी अंतरावर दुसरी शाळा सुरू करण्यात यावी.बोलल्या जात आहे कि डॉ ए. पी. जे. अब्दुल कलाम निवासी आश्रमशाळा मधिल संस्था चालकाला शिक्षण विभागाकडून शाळा सुरू करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा पत्र नसुन ही शाळा सुरू आहे हा मोठा प्रश्न नागरिकांन कडून उपस्थित केला जात आहे. अशा शाळेची चौकशी करावी जने करून आदिवासी मुलाचा भविष्य खराब होणार नाही अशी मागणी परिसरातील नागरिकांन कडून केली जात आहे.
----------------------------------------
मि शाळेला भेट दिली होती व शाळेतील शिक्षकांना शाळा सुरू करण्याचा (प्रमिसन) पत्र मागितले होते. परंतु त्यांनी आज पर्यंत शाळा सुरू करण्याचा मला कशाही प्रकारचा पत्र दाखविले नाही.
सावरकर सर
केंद्रप्रमुख मोरगड