गणेश भड/उपसंपादक RC24 न्युज....
एकेकाळी राज्यात उत्पन्नात नंबर एक वर असलेल्या जळगाव जामोद आगाराचा कारभार सुस्त आगार प्रमुख व बेशिस्त कर्मचारी यांच्यामुळे ढेपाळला असून दिनांक २५ सप्टेंबर च्या सकाळी ११.३० ते एक वाजे दरम्यान जळगावचे डेपो प्रवाशांनी खच्च भरले असताना. एकही बस वेळेवर लागत नसल्याने प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागला.जळगाव आगारावर जळगाव, संग्रामपूर व नांदुरा या तीन तालुक्यांतील प्रवासी वाहतुकीची मोठी जबाबदारी आहे. मात्र मागील काही दिवसांपासून आगाराचा कारभारण बेशिस्त व ढेपाळला असून कोणत्याच बस फेऱ्या वेळेवर सुटत नाही. दि.२५ सप्टेंबरच्या सकाळी अकरा वाजून तास मिनिट ते एक वाजे दरम्यान बसचे आगार प्रवाशांनी गच्च भरले असताना एकही बस फेरी लावण्यात आली नाही त्यामुळे नांदुरा, संग्रामपूर ,जामोद ,शेगाव, वरवट आदी मार्गाने जाणारे प्रवासी याबाबत वेळोवेळी वाहतूक नियंत्रकाला विचारणा करीत होते .काही प्रवासी व विद्यार्थी यांनी तर चक्क आगार प्रमुख यांच्यासोबत डेपोत जाऊन संवाद साधण्याचा व त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता उपस्थित सुरक्षा रक्षकांनी प्रवाशांना रोखले. याच दरम्यान सकाळी पहिल्या सत्रातील शाळांना सुट्टी झाल्याने प्रवासी व विद्यार्थी मोठ्या संख्येने तात्काळत बसची वाट पाहत होते. सतत दोन तास जळगाव जामोद आगाराचा कारभार ठप्प पडला होता . डेपोत नऊ ते दहा बसेस उभ्या असताना व बस फेऱ्यांची वेळ झाली असताना बसेस प्लॅटफॉर्मवर लावल्या जात नसल्याने याबाबत अनेकांनी आगार प्रमुखांना विचारणा करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुरक्षा रक्षकांनी त्यांना आगार प्रमुखांकडे जाऊ दिले नाही. अखेर दोन तासानंतर डेपो मध्ये जमा असलेल्या नऊ बस पैकी काही बसेस प्रवाशांकरता उपलब्ध करून देण्यात आल्या दोन तासानंतर बसेस लागल्याने प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली. जळगाव आगाराच्या कोणत्याच बसेस दररोज नियमित वेळेवर सुटत नाहीत त्यामुळे प्रवासी हैराण झाले असून वरिष्ठांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे अशी भावना संतप्त प्रवाशांनी व्यक्त केली. सतत दोन तास बसेस डेपो मध्ये असताना सुद्धा प्लॅटफॉर्मवर लावण्यात आल्या नाहीत त्यामुळे मोठा गोंधळ उडाला. महिलांना प्रवासी सवलत दिल्यानंतर राज्य परिवहन मंडळाच्या बसेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे मात्र ढिसाळ नियोजन व चुकीचे व्यवस्थापन यामुळे जळगाव आगाराचा बोजवारा उडाला असून त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. दोन तास नियोजित बस फेऱ्या वेळेवर सोडल्या नाहीत. त्यानंतर मात्र नांदुऱ्या करता एकाच वेळी जळगाव ते बुलढाणा, जळगाव ते मोताळा, जळगाव ते अकोला व जळगाव ते नांदुरा अशा चार बसेस एकाच मार्गाने सोडण्यात आल्या यावरून या आगाराचे किती ढिसाळ नियोजन व चुकीचे व्यवस्थापन होत असल्याची चर्चा प्रवाशात होती. सतत दोन तास डेपो मध्ये नऊ बसेस उभ्या असताना बस फेरीची वेळ झाल्यानंतरही बसेस लावण्यात आल्या नाहीत. दोन तासानंतर मात्र एकाच वेळेस चार बसेस नांदुरा मार्गावर लावण्यात आल्या यावरून या आगाराचे ढिसाळ नियोजन व चुकीचे व्यवस्थापन सुरू असल्याची ओरड प्रवाशांची होती ,डेपोत नऊ बसेस असताना बस नसल्याची ओरड# जळगाव- प्लॅटफॉर्मवर सतत दोन तास येथील एकही बस लागत नसताना डेपो मध्ये मात्र नऊ बसेस उभ्या होत्या. प्रवाशांची गर्दी झाली, त्यांना त्रास होत आहे , नियोजित वेळेवर बसेस सोडल्या जात नाही. या सर्व प्रवासी हिताकडे पाठ फिरवीत . राज्य परिवहन मंडळाचे कर्मचारी व आगारप्रमुख या सर्व प्रवासी हिताच्या बाबींकडे दुर्लक्ष करीत होते.
