सामाजिक, धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असणाऱ्या डोणगांव ता मेहकर येथील संजीवनी सेवाभावी परिवाराच्या 26 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रगती,समृध्दी कडे जाताना संवेदनशीलता कमी होत आहे,ती संवेदनशीलता टिकविण्याचे काम संजीवनी परिवाराच्या माध्यमातून होत आहे याचा मला अभिमान आहे,असे मत आ श्वेताताई महाले यांनी व्यक्त केले असुन यावेळी साहित्यिक व कवी संगीता चव्हाण यांना संजीवनी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सौ संगीता जितेंद्र सिंह चव्हाण या जलंब येथील पाई विद्यालय मध्ये सहाय्यक शिक्षिका असुन त्या उत्कृष्ट कविता,लिखाण करतात ,महाराष्ट्र राज्याच्या प्रत्येक साहित्य संमेलन मध्ये त्यांचा अग्रेसर सहभाग असतो,यापूर्वी साहित्यिक क्षेत्रात त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत, त्यांच्या साहित्याची दखल घेऊन संजीवनी परिवाराने त्यांना सन्मानित केले आहे,दि 2 फेब्रुवारी राजुरकर मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयंतबाप्पु बिडवई तर प्रमुख अतिथी म्हणून सत्कारमूर्ती आ.श्वेताताई महाले, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख, श्री शिवाजी शिक्षण संस्था अध्यक्ष राजेंद्र आखाडे, परतवाडा पोलीस निरीक्षक सुरेश म्हस्के,भाजपा तालुकाध्यक्ष अँड शिव ठाकरे, सौ वंदना आखाडे, डॉ अनुपमा झोरे,राजेंद्र पळसकर, यांची उपस्थिती होती, मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन आयोजकांच्या वतीने अतिथीचां भव्यदिव्य स्वागत समारंभ संपन्न झाला, प्रास्ताविक मनोगतातून संजीवनी परिवाराचे अध्यक्ष डॉ गजानन उल्हामाले यांनी पुरस्कार देऊन सन्मानित करण्या मागील भूमिका स्पष्ट केली,याप्रसंगी स्व माधवराव उल्हामाले स्मृति प्रित्यर्थ संजीवनी सेवाव्रती पुरस्काराने सौ संगीता जितेंद्र सिंह चव्हाण यांना सन्मानित करण्यात आले, यावेळी त्यांनी कविता वाचन करून दाद मिळवली,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हमीद मुल्लाजी तर आभार सुरेश आप्पा फिसके यांनी मानले,यशस्वीतेसाठी गणेश वाघमारे ,सुरेन्द्र सिंह चव्हाण ,प्रा गजानन सातपुते, डॉ नकुल फुले यांनी अथक परिश्रम घेतले
साहित्यिक सौ. संगीता चव्हाण संजीवनी सेवाव्रती पुरस्काराने सन्मानित...वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार सोहळा..
सुरज देशमुख/बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
