संत्रा पिक विमा बाबत तीव्र आंदोलनाचा इशारा - समाधान दामधर..संत्रा पिक विमा मध्ये झारीतील शुक्राचार्य कोण..?
जळगाव जामोद प्रतिनिधी...
दिनांक 30 मे रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी निवेदन देऊन शेतकऱ्यांच्या खात्यात संत्रा व इतर पिक विमा तात्काळ जमा करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.यावेळी तहसीलदार तथा पिकविमा समिती अध्यक्ष यांनी तात्काळ पिक विमा समितीची बैठक घेऊन प्रस्ताव पाठविण्यात येईल असे आश्वासन दिले.
सदर निवेदनात नमुद आहे की, जळगाव जामोद तालुक्यात वर्ष २०२४-२५ मधील संत्रा व इतर फळ पिक विमा शेतकऱ्यांनी काढलेला आहे. वर्ष २०२४ -२५ मध्ये हवामानाच्या अनिअमिततेमुळे संत्रा व इतर फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सदर नुकसानी बाबत जळगाव जामोद तहसील विभागा मार्फत तलाठी, कृषी सहाय्यक व ग्राम सेवक यांचे मार्फत नुकसानीचे सयुक्त पंचनामे पण झालेले आहेत.विशेष म्हणजे जळगाव जामोद च्या लागतच असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे खात्या मध्ये सदर फळ पिक विमा जमा झालेला आहे. ओनलाईन वेदर रिपोर्ट नुसार व येथील स्थानिक नागरिकांच्या माहिती नुसार संग्रामपूर तालुक्यातील एक शेत व जळगाव जामोद तालुक्यातील एक शेत यामधील अंतर ५० मिटर पेक्षाही कमी असतांना एका तालुक्यातील शेतकऱ्यांचा विमा मंजुर होतो व एका तालुक्यातील शेतकऱ्यांचा विमा मंजुर होत नसल्याने पुर्ण व्यवस्थेवर शंका निर्माण होत आहे.विमा कंपनी च्या प्रतिनिधी सोबत बोललो असता अजून जळगाव जामोद तालुक्याचा स्कायमेट वेथर डाटा अनुम सबमिट झालेला नसल्याची माहिती देत आहेत तर बुलढाणा येथील फळबाग तांत्रिक अधिकारी यांना बोललो असता उडवा उडवी ची उत्तरे मिळत आहेत.तरी जळगाव जामोद तालुक्यातील संत्रा व इतर फळपिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम जमा करण्यात यावी.सदर शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम जमा न झाल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल व या करिता प्रशासन म्हणून आपण सर्वस्वी जबाबदार असाल, तरी जळगाव जामोद तालुक्यातील संत्रा व इतर फळपिक विमा शेतकऱ्यांना तात्काळ विमा रक्कम जमा करण्यात यावी.