आसलगाव नदीवरील बंधारा दोन वर्षापासून तुटलेलाच.. अद्यापही काम अपूर्णच..
जळगाव जामोद प्रतिनिधी...
आसलगाव नदीवरील तुटलेल्या बंधाऱ्याचे काम दोन वर्षापासून अद्यापही अपूर्णच आहे आसलगाव व आसलगाव परिसरात जुलै 2023 ला प्रचंड प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने त्यामध्ये परिसरात प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते त्यामध्येच आसलगाव येथील पुत्र उल्हासी नदीवर बंधारा बांधला होता या बंधाऱ्यामुळे अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला कारण नदी डोंगरामधून अति वेगाने वाहत असल्याने पाणी थांबत नव्हते त्यामुळे लाखो रुपये खर्चून बंधारा बांधण्यात आला त्यामुळे बऱ्याच प्रमाणे पाणी आडले होते त्यापासून अनेक शेतकऱ्यांना फायदा झाला रब्बी हंगामा करता त्या पाण्याचा उपयोग होत होता तसेच विहिरीची पातळी सुद्धा वाढली होती 22 जुलै 2023 च्या पुराने बंधारा तुटला त्या बंधार्याचे अनेक वेळा सर्वे झाले पण संबंधित विभागाने अजून सुद्धा याचे काम पूर्ण केलेले नाही आता पावसाळा अगदी तोंडावर येऊन सुद्धा संबंधित प्रशासनाने कुठली दुरुस्ती व देखभाल केलेली नाही वारंवार शेतकऱ्यांनी संबंधित विभागाकडे दुरुस्तीची मागणी करून सुद्धा संबंधित प्रशासनाने अजून पर्यंत कुठलेच काम केलेले नाही त्यामुळे शासनाने लाखो रुपये खर्च करून बांधलेला बंधारा अजून सुद्धा अपूर्णच आहे त्यामुळे येत्या हंगामात सुद्धा शेतकऱ्यांना या बंधाऱ्याचा काही उपयोग होणार नाही संबंधित प्रशासनाच्या हलगर्जीमुळे या बंधाऱ्याचे काम अपूर्ण राहिल्याचे शेतकऱ्यांमध्ये बोलल्या जात आहे..