पळशी (सुपो) येथे ‘विकसित कृषी संकल्प अभियान 2025’ उत्साहात पार पडले..नवीन कृषी तंत्रज्ञानावर शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...
जळगाव जामोद प्रतिनिधी–
मध्यभारत विकास फाउंडेशन, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी विज्ञान केंद्र, जळगाव (जामोद) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विकसित कृषी संकल्प अभियान 2025’ हा विशेष मार्गदर्शन व संवाद सत्राचा कार्यक्रम सुपो पळशी येथे दिनांक 11 जून 2025 रोजी सकाळी 10.30 वाजता श्री सुपो संस्थान हॉल, पळशी येथे संपन्न झाला.या कार्यक्रमात CIRCOT, मुंबई येथील तज्ज्ञ शास्त्रज्ञ श्री डॉ.पी.एस. देशमुख सर व कृषी विज्ञान केंद्र जळगाव जामोद येथील तज्ञ् शास्त्रज्ञ् श्री शशांक दाते सर यांनी सोयाबीन, कापूस, संत्रा व केळी या पिकांवरील नविन लागवड तंत्रज्ञान, कीड व रोग नियंत्रण उपाय, तसेच शाश्वत उत्पादन वाढीच्या रणनीतींवर शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.यावेळी डॉ पी एस देशमुख सर यांनी कापूस पीक उत्पादन वाढ तंत्रज्ञान, गुलाबी बोड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी प्रतिबंधत्मक उपाय, यावर मार्गदर्शन केले. यावेळी श्री एस जी शिंदे सर यांनी सोयाबीन बिजप्रक्रिया कशी करावी, बिजप्रक्रिया करण्याचे फायदे, बीबीएफ ने पेरणी , पट्टा पेरणी पद्धत का वापरावी त्याचे पीक वाढीसाठी होणारे फायदे, यावर मार्गदर्शन केले. कु पी एस गवळी मॅडम यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, महाडिबीटी पोर्टल वरील अर्ज प्रक्रिया, फळबाग लागवड योजना याविषयी माहिती दिली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषी विभागाचे उप कृषी अधिकारी शिंदे सर होते, तर सहाय्यक कृषी अधिकारी गवळी मॅडम, ग्रामपंचायत सरपंच सौ. काकडे व ग्रा सदस्य आणि मध्यभारत विकास फाउंडेशनचे CEO अरुण निमकर्डे यांची उपस्थिती लक्षणीय ठरली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक गवळी मॅडम यांनी केले. सूत्रसंचालन अरुण निमकर्डे यांनी तर आभार प्रदर्शन प्रकल्प अधिकारी गजानन सातव यांनी केले.या संवाद सत्रात गावातील व परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी उपस्थित राहून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले.कार्यक्रमाचा उद्देश – “शेतीत वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवणे आणि उत्पादन क्षमता वृद्धिंगत करणे” – सफलतेकडे वाटचाल करत असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.