गोवंश रक्षणासाठी महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय...22 जुलैला राज्यभर साजरा होणार देशी गोवंश संवर्धन दिवस....


 
गोवंश रक्षणासाठी महायुती सरकारचा ऐतिहासिक  निर्णय...22 जुलैला राज्यभर साजरा होणार देशी गोवंश संवर्धन दिवस....

जळगाव जामोद प्रतिनिधी...

भारताच्या पवित्र भूमीवर गाईला माता म्हणून पुजले जाते. ऋषींच्या आश्रमात संतांच्या वचनात आणि हिंदू घराघरात गाईस पूज्य स्थान दिले जाते त्यामुळे गोमाताच्या सन्मानार्थ महाराष्ट्र शासनाने एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दरवर्षी 22 जुलै हा दिवस शुद्ध देशी गोवंश रक्षण आणि संवर्धन दिन म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा शुक्रवार दि. 13 जून रोजी करण्यात आली.समुद्रमंथनातून प्रकट झालेल्या रत्नांपैकी एक रत्न म्हणजे कामधेनु. देशी गाईंना कामधेनू म्हणून संबोधले जाते कारण त्यांच्या दुधाची उपयुक्तता शेण आणि गोमूत्र यांच्या औषधी व शेतीसाठी असलेले महत्त्व अतुलनीय आहे राज्यात मराठवाड्यात देवणी, लाल कंधारी पश्चिम महाराष्ट्रात खिल्लार,उत्तर महाराष्ट्रात डांगी आणि विदर्भात गौरव अशा विविध देशी जातींच्या गाई आढळतात.मात्र संकरित गायीच्या तुलनेत कमी उत्पादन क्षमता आणि प्रजनन क्षमता यामुळे देशी गायींची संख्या सातत्याने घटत आहे यावर उपाय म्हणून उच्च वंशावळीच्या देशी गाईंना निर्माण करण्यासाठी त्यांची उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी देशी गाईंचे संगोपन व संवर्धन खूप महत्त्वाचे आहे.

____________________________________________

 देशी गाईंचे दूध,शेण,तसेच गोमूत्र प्रत्येकामध्ये औषधी गुणधर्म आहेत.रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी गोमूत्र लाभदायी आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लोकांमध्ये देशी गाईनंविषयी जागरूकता निर्माण होईल.या ऐतिहासिक निर्णयासाठी महायुती सरकारचे आभार..

प्रिया सचिन हागे

 मानद प्राणी कल्याण अधिकारी महाराष्ट्र शासन.

Previous Post Next Post