कर्जमुक्ती व उर्वरित पीकविम्यासाठी शेतकऱ्यांचा शेगावात एल्गार...!तुपकरांची बैलगाडीतुन शेगावात भव्य मिरवणुक....
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
दिनांक १० जुन रोजी माहेश्वरी भवन शेगाव येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली भव्य उर्वरित पिक विमा व कर्जमुक्ती साठी एल्गार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या एल्गार मेळाव्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालुन झाली. त्यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने तुपकरांची बैलगाडीवर भव्य मिरवणुक काढत शहरामध्ये जंगी स्वागत केले.त्यानंतर कर्जमुक्ती,पिकविमा,भाव फरक, नुकसान भरपाई, पिककर्ज वाटप, जंगली जनावरांचा त्रास व शेतमजुरांना विमा सुरक्षा व इतर अनेक मागण्या तुपकरांनी एल्गार मेळाव्याच्या माध्यमातुन मांडल्या.जर सबंधीत प्रश्न सरकाने निकाली काढले नाही,तर प्रसंगी मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा सज्जड इशारा तुपकरांनी यावेळी दिला.या एल्गार मेळाव्याला प्रचंड संख्येने शेतकरी, शेतमजुर, कष्टकरी बांधव उपस्थित होते.