💥केला आणि छोरीया सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद येथे पर्यावरण दिन, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व टेलिस्कोप उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न...
जळगाव जामोद प्रतिनिधी....
“बदले हम तस्वीर जहाकी ,
सुंदर सा एक दृश्य बनाये ,
संदेश ये हम सब तक फैलाए ,
आओ पर्यावरण बचाये..”
सहकार विद्या मंदिर, जळगाव जामोद येथे ५ जून रोजी पर्यावरण दिन, दहावी व बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, तसेच शाळेत नव्याने आणलेल्या टेलिस्कोपचे उद्घाटन अशा त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात पर्यावरण दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण व जनजागृती उपक्रमांनी झाली. विद्यार्थ्यांनी ‘हरित भारतासाठी हिरवे पाऊल’ या संकल्पनेवर आधारित शाळेत विविध उपक्रम घेतले व शाळेतील परिसरात झाडे लावून पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला.शाळेचा विद्यार्थी साई इंगळे यांने IIT JEE advanced मध्ये 506 क्रमांक पटकावल्या बद्दल त्याचे व त्यांच्या पालकांचे सुद्धा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यानंतर दहावी व बारावीच्या परीक्षांमध्ये उत्तम यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. डॉ. किशोरजी केला सर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते व डॉ. सौ स्वाती केला मॅडम या प्रमुख पाहुणे म्हणून लाभल्या. तसेच शाळेचे प्राचार्य आदरणीय विनायक उमाळे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विनोदजी ईश्वरे , सहकार विद्या मंदिर वरवट बकालचे प्राचार्य राजेशजी लोहिया, पर्यवेक्षिका मनीषा म्हसाळ आणि अरुणा व्यवहारे उपस्थित होते या सर्वांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.याच कार्यक्रमात शाळेत नव्याने उपलब्ध झालेल्या टेलिस्कोपचे उद्घाटन करण्यात आले. या उपक्रमामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना खगोलशास्त्राची प्रत्यक्ष ओळख होणार आहे. तसेच विद्यार्थ्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वाढीस लागण्यासाठी. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर किशोर जी केला सर यांनी गुणवंत विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व पर्यावरणाचे रक्षण म्हणजे नेमके काय करावे याचे महत्त्व विद्यार्थ्यांना शाळेत राबवीत असलेल्या उपक्रमांद्वारे समजून सांगितले तसेच शाळेच्या मुख्य संयोजिका यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी आयुष्यात जगताना कसे जगावे हे आपल्या भाषणातून सांगितले.कार्यक्रमाची आखणी योगेश घुटे सर यांनी केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक पारुला शर्मा यांनी केले. पर्यावरण गीतातून पर्यावरण रक्षणाचा संदेश प्रगती तायडे यांनी दिला. सूत्रसंचालन वर्षा वडाळे यांनी उत्तमरित्या पार पाडले, तर आभार प्रदर्शन रूपाली बोदडे यांनी केले.कार्यक्रमात पालक, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी या बहुआयामी उपक्रमाचे कौतुक करत शाळेच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन केले.