💥वायरमन साठी गावकरी टॉवरवर चढणार.चक्क बारा महिन्यापासून विद्युत वितरण कंपनीची बत्ती गुल...
बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी...
मोताळा तालुक्यातील सारोळा मारोती,फरदापुर, सारोळा पीर गावात कायमस्वरूपी वायरमन देण्यात यावा.24 तासात मागणीची पूर्तता करावी. अन्यथा गावातील टावरवर चढून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा निवेदनकर्ते ग्राम स्वराज्य समिती, राष्ट्रीय बजरंग दल, आझाद हिंद शेतकरी संघटना आणि ग्रामस्थांच्या वतीने सादर केलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे.पाच जूनला देण्यात आलेल्या निवेदनामध्ये मागील 11 ते 12 महिन्यापासून गावामध्ये स्थायी स्वरूपात एकही वायरमन नाही. त्यामुळे मागील बारा महिन्यापासून ग्रामवासी यांचे बत्ती गुल झाली आहे. विना वायरमन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी कारभार कसा चालतो.असा प्रश्न गावकऱ्यांनी उपस्थित केला. या अनुषंगाने गावकऱ्यांनी वारंवार संबंधितांकडे विनंती मागणी केलेली आहे. परंतु प्रत्येक वेळी आज उद्या करीत बारा महिन्याचा कालावधी उलटून गेला आहे. परंतु अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आले नाही. त्यामुळे शेतकरी व विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. यासह टावर वर चढून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.निवेदनावर ॲड.सतीशचंद्र रोठे पाटील, प्रदीप सुधाकर कुऱ्हाडे उपसरपंच सारोळा मारोती, मोहनराव पाटील, विठ्ठल ढकचवळे, भूपेश शेळके पाटील, मनोज व्यवहारे पाटील,सुशांत शेळके पाटील,कमलाकर व्यवहारे,पुरुषोत्तम व्यवहारे,संजय येंडोले,शेख अफसर, गोपाल शिप्पलकर , विजय ढकचवळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
__________________________________
जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर.
जिल्हाधिकारी, अधीक्षक अभियंता.कार्यकारी अभियंता,जिल्हा पोलीस अधीक्षक, बुलढाणा, उपकार्यकारी अभियंता, एमईसीबी, तहसीलदार,बीडिओ मोताळा,ठाणेदार बोराखेडी, धामणगाव बढे. आदिनाथ निवेदनाच्या प्रती सह आंदोलनाची माहिती दिली आहे.
_____________________________________