जळगाव जामोदमध्ये जेसीआय ग्रुपतर्फे भव्य रक्त तपासणी शिबिर यशस्वी!१११ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रोफेशनल टीमद्वारे नमुने थेट मुंबईला तपासणीसाठी रवाना...


 
जळगाव जामोदमध्ये जेसीआय ग्रुपतर्फे भव्य रक्त तपासणी शिबिर यशस्वी!१११ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग, प्रोफेशनल टीमद्वारे नमुने थेट मुंबईला तपासणीसाठी रवाना...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

७ जून २०२५ रोजी JCI जळगाव जामोद यांच्या वतीने आयोजित रक्त तपासणी शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले. सकाळी ७ ते १० या वेळेत पार पडलेल्या या उपक्रमात एकूण १११ नागरिकांनी आपल्या रक्ताचे नमुने देऊन अभूतपूर्व प्रतिसाद दिला.हे शिबिर केवळ तपासणीपुरते मर्यादित न राहता, आरोग्याबद्दलची सजगता आणि सामाजिक सहभाग वाढवणारा उपक्रम ठरला.या शिबिरासाठी संभाजीनगर येथून प्रोफेशनल टेक्निशियन टीम खास आमंत्रित करण्यात आली होती. मयूर फलटणकर आणि त्यांच्या टीमने अत्यंत दक्षतेने सॅम्पल गोळा करून त्यांना शास्त्रीय पद्धतीने पॅक करून तात्काळ मुंबईतील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवले.बाजारात या तपासण्यांची किंमत सुमारे ₹ 5600 दरम्यान असताना, JCI जळगाव जामोदतर्फे केवळ ₹ 950 मध्ये उपलब्ध करून दिलेली ही सेवा अनेक नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली. आर्थिकदृष्ट्या व औद्योगिकदृष्ट्या या उपक्रमाचा लाभ जळगावकरांना मोठ्या प्रमाणात झाला.या उपक्रमाची संकल्पना, नियोजन, अंमलबजावणी  यामध्ये संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित मिश्रा यांची  सातत्यपूर्ण मेहनत आणि संयोजन कौशल्य यांचा फार मोठा वाटा होता.त्यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण टीमने सुसंघटित पद्धतीने कार्य केले आणि या उपक्रमास आजचे यश मिळाले.या सर्व यशस्वीतेबद्दल संस्थापक अध्यक्ष प्रसेनजित मिश्रा यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की,"गावात जेव्हा अशा प्रकारचे आरोग्य उपक्रम आयोजित केले जातात, तेव्हा केवळ एक तपासणी होत नाही, तर संपूर्ण गावात आरोग्याची नवीन चळवळ उभी राहते.आजचा प्रतिसाद पाहून विश्वास बसतो की आपण जळगाव जामोदकरांसाठी जे विचार केले, तो विचार खरी दिशा घेत आहे."या ऐतिहासिक उपक्रमामागे जेसीआयचे संपूर्ण सदस्य मंडळ कार्यरत होते.विशेषतः प्रकल्पाचे प्रोजेक्ट डायरेक्टर डॉ. सतीश शिरेकर व डॉ. मंगेश बडेरे यांचे मार्गदर्शन व संयोजन अतुलनीय ठरले.कोषाध्यक्ष जेसी अमरसिंग राजपूत यांचेही सहकार्य मोलाचे ठरले.याशिवाय जेसी गोपाल गोदानी, राम लढा, जितेश पलन, संजय पलन यांनीही आपापले जबाबदारीने योगदान दिले.या उपक्रमामुळे जळगाव जामोदमधील नागरिकांमध्ये आरोग्याविषयी जागरुकता वाढली असून भविष्यात आणखी असेच उपक्रम होणे गरजेचे आहे, असे मत अनेक नागरिकांनीही व्यक्त केले.

Previous Post Next Post