वीज पुरवठा खंडित असणाऱ्या वंचित शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन आणि इशारा...


 
वीज पुरवठा खंडित असणाऱ्या वंचित शेतकऱ्यांसाठी वंचित बहुजन आघाडी चे निवेदन आणि इशारा...

जळगाव जामोद प्रतिनिधी...

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा जळगाव जामोद उपकार्यकारी अभियंता यांना दिनांक ९ जुन रोजी वंचित बहुजन आघाडी तालुका अध्यक्ष रमेश नाईक यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले.वीज पुरवठ्या पासून अजूनही कित्येक शेतकरी वंचित आहेत आणि अशा या वंचित शेतकरी बांधवांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी सतत तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई यांनी पाठपुरावा केला.शेतकऱ्यांना सुरळीत वीज पुरवठा मिळावा यासाठी वंचित बहुजन आघाडीने महत्वपूर्ण पाऊल उचललेले आहे.शेती मशागतीचे दिवस असताना शेतकरी बांधव उन्हा- तानात राबतो आणि त्याला सिंचन करताना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागते. 

1. चक्रीवादळापासून अजूनही शेतकरी बांधवांच्या डीपी कनेक्शन पडलेले आहे. 

2. शेतकरी बांधवांच्या बांधावरील विजेचे पोल सरळ करणे बाबत 

3. विजेच्या पोल वरील तार ओढून घेणे बाबत.

4. खंडित पडलेला वीज पुरवठा तात्काळ सुरू करण्याबाबत 

5. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ शाखा पिंपळगाव येथे कायमस्वरूपी कनिष्ठ अभियंता देणेबाबत. 

अशा विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा आठ दिवसानंतर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल असा इशारा देखील देण्यात आला.निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे नवनियुक्त तालुका अध्यक्ष रमेश नाईक,ज्येष्ठ नेते साहेबराव भगत, तालुका महासचिव श्रीकृष्ण गवई,तालुका उपाध्यक्ष हरिदास वाघमारे, अस्मत खान, सुरेश वाघोदे, भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष जगदीश हातेकर, तालुका उपाध्यक्ष प्रमोद कोकाटे, शहराध्यक्ष प्रवीण तायडे, सुभाष शेगोकार, मीडिया प्रमुख रवी जाधव, वंदनाताई भगत, महिला तालुकाध्यक्ष हेलोडे ताई, वानखडे ताई, पारवे ताई, सुनील इंगळे, विनोद वानखडे, भास्कर जुंबळे ,ज्येष्ठ पत्रकार उत्तम वानखडे, संतोष पवार, उत्तम बांगर तसेच वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी, महिला आघाडी, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन शहर आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post Next Post