नागपुर-पुणे वंदे भारत रेल्वेचा 10 ऑगस्ट ला होणार शुभारंभ.. शेगांवलाही मिळाला थांबा…! केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मानले केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांचे आभार…!
बुलढाणा जिल्हा प्रतिनीधी...
नागपुर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसला संत नगरी शेगांव मध्ये थांबा मिळवुन देण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केले आहे. यासंदर्भातील परिपत्रक रेल्वे विभागाच्या वतीने आज 7 ऑगस्ट रोजी काढण्यात आले आहे. 10 ऑगस्ट ला वंदे भारत ट्रेन चे उदघाटन होणार असुन या वंदे भारत ट्रेनमुळे नागपुर आणि पुणे येथुन येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना विशेष प्रवास सुविधा मिळणार आहे. वंदे भारत रेल्वे सुरु करण्यासंदर्भात व शेगांव ला थांबा मिळण्यासाठी नुकतीच केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती त्यानंतर हे परिपत्रक निर्गमित झाले आहे.देशांतर्गत रेल सेवेला गतीमान करण्याच्या दृष्टीकोनातुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वंदे भारत रेल सेवा सुरु केली आहे. अत्यंत जलद आणि लोकांना आधुनिक सुख सुविधा देणारी भारतीय बनावटीची वंदे भारत रेल्वे भारतीयांच आकर्षण ठरली आहे. नागपुर ते पुणे हे दोन महानगर वंदे भारत रेल्वे मार्गाने जोडण्याचे काम केंद्र सरकारच्या रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. ही गाडी सुरु होत असतांना पहिल्या परिपत्रकामध्ये अजनी, नागपुर, वर्धा, बडनेरा, अकोला, भुसावळ, जळगांव, मनमाड, कोपरगांव, अहिल्यानगर, दौंड मार्गे पुणे असा वंदे भारत रेल्वे चा प्रवास थांबा मंजुर करण्यात आले होते. विदर्भाची पंढरी म्हणुन ओळख असलेल्या बुलढाणा जिल्हयातील संतनगरी शेगांव येथील दररोज देशभरातुन भाविक येत असतात. नव्याने सुरु होत असलेल्या वंदे भारत या रेल्वेला शेगांव येथे थांबा मिळावा यासाठी केंद्रिय आयुष आरोग्य व कुटूंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्हयाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेवुन मागणी केली होती. शेगांव संस्थान विषयी रेल्वे मंत्र्यांना माहिती देऊन हा थांबा भाविकांसाठी महत्वाचे असल्याचे त्यांना पटविन दिले होते. त्या नंतर रेल्वे विभागाच्या वतीने शेगांव रेल्वे स्थानकाला थांबा देण्यासंदर्भातील परिपत्रक 7 ऑगस्ट ला रेल्वे बोर्डाचे निदेशक संजय निलम यांच्या स्वाक्षरीने निर्गमीत झाला आहे. नागपुर-पुणे वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ 10 ऑगस्ट ला होणार आहे. हि गाडी आठवडयातुन 6 दिवस चालणार असुन नागपुर येथुन सकाळी 09.50 ला सुटनार असुन वर्धा, बडनेरा, अकोला, मार्गे दुपारी 01.20 च्या दरम्यान शेगांव येथे ही वंदे भारत रेल्वे थांबणार आहे. तर परतीच्या प्रवासात पुण्यावरुन येतांना दुपारी 02.45 वा. शेगांव येथे ही रेल्वे थांबणार आहे. नागपुर-पुणे हे 884 कि.मी. चे अंतर ही वंदे भारत रेल्वे अवघ्या 10 तासात पुर्ण करणार आहे. सकाळी 09.50 ला नागपुर येथुन सुटणारी ही वंदे भारत ट्रेन प्रवाशांना त्याच दिवशी रात्री 09.50 ला पुणे येथे सोडणार आहे.
_________________________
बुलढाणा लोकसभा मतदार संघातील शेगांवचे संत गजानन महाराज संस्थान संपुर्ण देशामध्ये प्रसिध्द आहे. देशभरातुन लाखो भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगांव नगरीमध्ये येत असतात. पुणे आणि नागपुर हे दोन्ही महानगर हवाई सेवेशी जोडलेले आहे. या महानगरातुन देश-विदेशातुन येणाऱ्या संत गजानन महाराजांच्या भक्तांना प्रवासाची सुविधा उपलब्ध करुन देणारी हि वंदे भारत रेल्वे ठरणार आहे. भाविकांच्या आणि मतदार संघातील नागरीकांच्या सुविधेसाठी केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी वंदे भारत ट्रेनला शेगांव येथे थांबा मिळवुन दिल्याने तिचा लाभ भक्तांसोबत जिल्हयातील नागरीकांनाही होणार आहे. केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलेली मागणी केंद्रिय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांनी मान्य करुन या संदर्भातील परिपत्रक निर्गमित केल्याने केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हावासीयांच्या वतीने केंद्रिय रेल्वे मंत्र्यांचे आभार मानले आहेत.