भटक्या विमुक्त जाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक... दिले उपविभागीय अधिकारी यांना निवेदन...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
धनगर समाजाला भारतीय घटनेमधील भटक्या विमुक्त जाती या प्रवर्गातून आरक्षण दिले गेले आहे.परंतु त्याची आजपर्यंत अंमलबजावणी झाली नाही त्यामुळे आजही धनगर समाज मुख्य प्रवाहापासून वंचित आहे यासाठी धनगर समाज अनेक वर्षांपासून संघर्ष करीत असुन त्याच करिता जालना येथे दिनांक १७ सप्टेंबर पासून धनगर समाजाचे दीपक बोराडे व सर्व धनगर समाज बांधव उपोषणास बसलेले आहेत.परंतु सरकारने उपोषणाची कोणत्याही प्रकारची दखल घेतली नसून या अनुषंगाने दिनांक २६ सप्टेंबर रोजी जळगाव जामोद तालुक्यातील धनगर समाज बांधव यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धनगर समाजाला एसटी सवलतीचे आरक्षण अंमलबजावणी करीता निवेदन दिले.निवेदन देतेवेळी चंदा पुंडे ज्येष्ठ नेत्या, अशोक साबे तालुकाध्यक्ष धनगर समाज महासंघ, युवा नेते दिलीप भिवटे, शुभम बोळे तालुकाध्यक्ष मल्हार सेना, विठ्ठल पाचपोर, भागवत खाळपे, शिवदास सोनोने, अरुण बोळे, हरिदास वाघमारे,संजय फासे,गणेश वसंत साबे, प्रमोद तितरे, अमित भिवटे,सरपंच निलेश साबे,विठ्ठल सुशिर,बळीराम पुंडे,अंबादास वसतकार, ईश्वर घुले,वासुदेव लोणाग्रे,विठ्ठल कवळे, सागर बोळे,निलेश खाळपे,राजू साबे,अर्जुन घोंगे,अमोल बोंद्रे, सुनील खाळपे,एकनाथ साबे, देवलाल डांगे,नामदेव पुंडे, सुभाष खाळपे,रामचंद्र मोळे तसेच बहुसंख्य धनगर समाज बांधव उपस्थित होते....