समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण...आ.डॉ.संजय कुटे...चालठाणा येथे महाराजस्व समाधान शिबिर--जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न...


 
समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण...आ.डॉ.संजय कुटे...चालठाणा येथे महाराजस्व समाधान शिबिर--जिल्हाधिकारी किरण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न...

जळगाव जामोद प्रतिनिधी....

सुनगांव ग्रामपंचायत हद्दीतील ग्राम चालठाणा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दिनांक २७ सप्टेंबर रोजी आमदार डॉक्टर संजय कुटे, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील तसेच उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. गरजूंना शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ हा थेट पोहोचला पाहिजे त्याकरिताच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्म दिवसापासून ते दोन ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती पर्यंत जिल्हाभरात महारास्व समाधान शिबिर प्रत्येक गावात होणार असून समाधान शिबिर हे लोकाभिमुख प्रशासनाचे उत्तम उदाहरण असून यामुळे सर्व सेवा एका छताखाली सर्वसामान्यांना उपलब्ध होतात. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी केले.शिबिराच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील व आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या हस्ते वृक्षदिंडीचे पूजन करून चालठाना गावांमधून प्रभात फेरी काढण्यात आली.

महाराजस्व समाधान शिबिरामध्ये  महसूल, कृषी, आरोग्य, पुरवठा, सेतू केंद्र, ग्रामपंचायत व पंचायत समिती, महिला व बालकल्याण, शिक्षण, पशुसंवर्धन, समाज कल्याण अशा विविध खात्यांनी सहभाग नोंदवून शेकडो लाभार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ दिला. यामध्ये अॅग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी, ई-रेशन कार्ड, कागदपत्रांचा बटवा, विविध प्रमाणपत्रे, रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड तसेच ट्रॅक्टर वाटप आदींचा समावेश होता. यावेळी आ. डॉ संजय कुटे जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार उपविभागीय अधिकारी शैलेश काळे तहसीलदार पवन पाटील यांच्या हस्ते लाभार्थ्यांना विविध दाखले वितरित करण्यात आले.यावेळी सुनगाव सरपंच रामेश्वर अंबडकार, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.उज्वला पाटील,गटशिक्षणाधिकारी श्रीकांत जोशी, पत्रकार ,ग्रामविकास अधिकारी जोशी, मंडळ अधिकारी, महसूल अधिकारी, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी, कृषी मित्र,समस्त गावकरी उपस्थित होते. सूत्रसंचालन तलाठी जी.डी वाघ यांनी केले. आभार तहसीलदार पवन पाटील यांनी मानले तसेच सर्वांनी महाराजस्व समाधान शिबिराचा लाभ घ्यावा असे यावेळी आव्हान केले.

Previous Post Next Post