स्मृतिगंध कार्यक्रमाने उजाळील्या दाही दिशा.तीस वर्षांनंतर जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी आले एकत्र...


 स्मृतिगंध कार्यक्रमाने उजाळील्या दाही दिशा.तीस वर्षांनंतर जिल्हा परिषदेचे माजी विद्यार्थी आले एकत्र...

जळगाव जामोद (प्रतिनिधी):

पिंपळगाव काळे जिल्हा परिषदेच्या माजी विद्यार्थ्यांचा 1993 ते 99 च्या पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम 17 मे रोजी पिंपळगाव काळे च्या जिल्हा परिषदेच्या प्रांगणात मोठ्या थाटामाटा संपन्न झाला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून विद्येची आराध्य देवता सावित्रीबाई फुले, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रमाता माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.तीस वर्षानंतर जुने मित्र-मैत्रिणी स्मृतिगंध या कार्यक्रमासाठी एकत्र झाले होते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं होतं. रखरखत्या उन्हातही सुखद गारव्याची अनुभूती प्रत्येकाला येत होती. त्यामुळे प्रत्येकाचं मन आनंद विभाग झालं होतं. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच सागरकुमार झनके यांनी अप्रतिम  सुंदर आवाजात सादर केलेल्या स्वागत गीताने सर्वांची मने जिंकली.डॉक्टर पुरुषोत्तम अवचार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करताना स्मृतिगंध कार्यक्रमाचा जीवनपटत अधोरेखिंकित केला विशेषतः शिक्षकांवर त्यांनी सादर  केलेली  कविता प्रत्येकाच्या मनात घर करून गेली.त्यानंतर उपस्थित गुरुजनांना शाल, पुष्पगुच्छ व बॅग देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदे शाळेचे विद्यमान मुख्यध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष हेंडवे सर,माजी शिक्षण अधिकारी ब्राह्मणे सर, सुरळकर सर,मरमट सर, धाडे सर ,वायाळ सर ,आल्हाट सर,मरमट सर,डी आर इंगळे सर,मेटांगे सर,जी.टी.चव्हाण सर,गावंडे सर,जावळेकर  सर, नाफडे मॅडम,वाढीले मॅडम,गावंडे मॅडम,विष्णू इंगळे,वानखडे,घोगले आधी शिक्षक वृंद व कर्मचाऱ्यांचा विद्यार्थ्यांचा हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी माजी विद्यार्थी किशोर सुलतानी व योगिता अवचार या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

तर वायाळ सर, आल्हाट सर, ब्राह्मणे सर,धाडे सर,मरमर सर, सुरळकर सर,डी.आर इंगळे सर, गावंडे मॅडम, नाफडे मॅडम,वराडे सर आदी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी आपल्या अध्यक्षीय भाषणात मुख्याध्यापक हेंडवे सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपण त्या काळातले विद्यार्थी आहोत ज्या काळात आजच्या सारख्या मल्टीमीडियाचा प्लॅटफॉर्म आपल्याला उपलब्ध नव्हता परंतु अतिशय संवेदनशील व भावनिक नाते शिक्षकांसोबत तयार झाले होते आणि ते नाते आजही कायम आहे.पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळा बंद पडत आहेत. शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी उन्हातानात फिरावे लागत आहे. पण आपली शाळा मात्र याला पूर्णतः अपवाद आहे. आपल्या शाळेचा पी.एम.सी मध्ये समावेश झाला असून जिल्ह्यातून आपली शाळा प्रथम क्रमांक आली आहे एन एम एम एस मध्ये जिल्ह्यातून सर्वात जास्त निकाल सुद्धा आपल्या शाळेचा असतो शाळेतील सर्व शिक्षक  विद्यार्थ्यांवर मेहनत घेतात त्यामुळेच शाळेचा निकाल हा चांगला लागत आहे. आपली शाळा उत्तरोत्तर प्रगती करत आहे.शाळेत सर्व सुविधा युक्त लॅब आणि वाचनालय आहे. गावकरी व शाळा व्यवस्थापन समितीचे चांगले सहकार्य मिळत आहे, त्यामुळे  आपल्या शाळेची पटसंख्या सुद्धा झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे आज जिल्हा परिषदेची ही शाळा प्रत्येकाला आपली वाटत आहे.आपण सर्व विद्यार्थ्यांनी स्मृतिगंध या कार्यक्रमाचे छान नियोजन केले आहे. यापुढेही आपण कार्यक्रमाचे असेच आयोजन करत रहा तुमच्या पुढील कार्यक्रमासाठी माझ्याकडून मी खूप खूप शुभेच्छा देतो.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉक्टर चंद्रकांत खोद्रे यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.पुरुषोत्तम अवचार, दीपक आराख, मंगेश भोपळे ,सागर झनके ,दीपक शेटे, राहुल बोराळे ,संतोष पांडे, चंद्रकांत खोद्रे,चंद्रकांत इंगळे, सोपान राऊत, संदीप उगले, विनोद टोंगलकार ,संदीप वाकोडे, शिवाजी अहिरकर, डॉ.स्मिता कोठारी, पुनम भैय्या,आरती बोडखे ,रेखा पदमण,योगिता अवचार,विद्य दिघे,आशा तायडे, सुनीता अवचार, मुग्धा कस्तुरे आदी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी परिश्रम घेतले

Previous Post Next Post