जागतिक बाजारपेठेत रोज वाढत जाणारे पेट्रोल डिझेलचे दर त्यामुळे सर्वसामान्य भारतीयांना याचा आर्थिक फटका रोज जाणवत असून या अनुषंगाने भारतामध्ये आयात केल्या जाणाऱ्या तेलावर नियंत्रण आणि कपात करण्यासाठी आत्मनिर्भर योजनेअंतर्गत तरुणांच्या हाताला काम व शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा यासाठी सरकारकडून शुगर बीट पासून इथेनॉल निर्मिती चे कारखाने भारतात ठीक ठिकाणी उभारण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे .देशात आयात होणाऱ्या तेलावर सरकारचा प्रचंड पैसा खर्च होत आहे . त्यामुळे भारतातील पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहे . व या भाववाढीमुळे प्रचंड महागाई ला ही सर्वसामान्यांना तोंड द्यावे लागत आहे .या गोष्टीवर उपाय म्हणून भारत सरकारने शुगर बीट पासून इथेनॉल निर्मिती प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याचे ठरवले असून निर्माण होणारे इथेनॉल पेट्रोल डिझेल मध्ये 20 टक्के मिश्रन करण्यासाठी भारत सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना मान्यता दिलेली आहे. त्यामुळे पेट्रोल डिझेलचे दर तर कमी होतीलच परंतु आत्मनिर्भर योजनेअंतर्गत तरुण व नविण उद्योजकांना या इथेनॉल निर्मितीच्या कारखान्यांमुळे संधी प्राप्त होणार आहे . त्याचाच एक भाग म्हणून जळगाव जिल्ह्यात राजनंदिनी बायोडिझेल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमार्फत शुगर बीट पासून इथेनॉल निर्मिती चा कारखाना उभारला जात आहे . तरुण उद्योजकांना यापासून रोजगार तर मिळणारच आहे . तसेच या इथेनॉल निर्मिती साठी लागणारा कच्चामाल शुगर बीट हेक्टरी 70 ते 80 टन उत्पादन होत असल्याने त्याचा फायदा शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी होणार आहे . असे या परीसंवादांत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वासुदेव तोताडे यांनी सांगितले . या परिसंवादाचे आयोजन मराठा मंगल कार्यालय वरणगाव येथे करण्यात आले होते परिसंवादात शेतकरी - गोकुळ जोगी धरणगाव, कडू राजपूत धरणगाव , अविनाश पाटील अंजनसोडे विठ्ठल चौधरी अंजनसोंडा , भगवान पाटील अंजनसोडा , गगन खडगे जळगाव हेमंत चौधरी सांगवी सुनील चौधरी वरणगाव , दीपक चौधरी पुणे , रवींद्र कोल्हे फुलगाव , गोपाल गावंडे वरणगाव , सुभाष पोद्दार वरणगाव संतोष चौधरी खडका, सुनील पाचपोळ , दत्तात्रय गुरव आदी शेतकरी बांधव उपस्थित होते . आभार अनिल पाटील यांनी मानले .
शुगर बीट पासून इथेनॉल निर्मिती सरकारचे प्राधान्य...
वरणगांव प्रतिनिधी:-सुनील पाचपोळ.
