हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण उघडण्यात आले.तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन...

 

वरणगाव प्रतिनिधी- सुनिल पाचपोळ

भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने काल रात्री 10वाजता धरणाचे 41दरवाजे पूर्ण उघडण्यात आले आहेत. आज काल दुपारी 1 वाजता तापी नदीपात्रात 80हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहेत. धरण क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने पाणी प्रवाह अजून वाढण्याची शक्यता असल्याने हतनूर धरणाचे खालील गावांमधील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये कुणीही आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. असे आवाहन कार्यकारी अभियंता एन पी महाजन जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांचेतर्फे करण्यात आले आहे.

Previous Post Next Post