महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ’ म्हणजेच ‘महाबीज’ हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे. महाविश्वासाचे बियाणे अशी ब्रिदवाक्य असलेले महाबिज पेरलं महा उगवलं महा मात्र प्रत्यक्षात शेतकरी स्वाहा अशी गत झाल्याने पथ्रोट शेतशिवारातील शेतकर्याने सोयाबीनला शेंगा न धरल्याने २ एकर क्षेत्रातील उभ्या पिकात ट्रॅक्टर चालवुन वखरले.महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतिचे बियाणे उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचा आभास निर्माण करुन ‘शेतकऱ्यांचं महामंडळ, शेतकऱ्यांची संस्था’ अशी या महामंडळाची ओळख आहे. सोबतच राज्य सरकारचं नफ्यात असलेलं एकमेव महामंडळ अशीही ओळख ‘महाबीज’नं जपली आहे.राज्यातील शेतकऱ्यांना प्रचलित वाणांचे गुणवत्तापूर्वक बियाणे मिळण्याच्या उद्देशाने साधारणतः सन 1960 च्या दरम्यान शासनाने तालुका बीज गुणन केंद्राची स्थापना करून बीजोत्पादनाला सुरुवात केली. या तालुका बीज गुणन केंद्रावरुन उत्पादित बियाणे शासनाच्या जिल्हा परिषद आणि पंचायत सर्मितीमार्फत शेतकऱ्यांना वितरित करण्यात येत होते. घरचेच बियाणे वापरण्यापेक्षा शासनाकडून पुरवठा केलेल्या त्याच वाणाच्या बियाण्यापासून अधिक
महामंडळाचे महाबिज ठरले अवसानघातकी.महाबिजचे सोयाबीन वांझोटे राहील्याने,शेतकर्याने दोन एकरात घातला ट्रॅक्टर..
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी