कोरोना काळात प्रथम ग्रामसभा गांगरखेड्यात सरपंच अविश्वास ठरावावर ग्रामसभेचा लागणार शिक्का...


 राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी 

मेळघाटमधील गांगरखेडाच्या सरपंचाविरुद्ध अविश्वास प्रस्ताव पारित होवुनही पेसाच्या पेचामुळे ग्रामसभेच्या शिक्कामोर्तबाशिवाय प्रस्ताव मंजुर होत नसल्याने आज सोमवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले आहे. कोरोना महामारीने ग्रामसभा राज्यभरात कुठेही झाली नसताना चिखलदरा तालुक्यातील गांगरखेडा येथील ग्रामसभा पहीली ठरावी.चिखलदरा तालुक्यात अनुसुचित जमाती (एस.टी.) बहुल वस्ती क्षेत्र असल्याने मेळघाटात पंचायत एक्सटेन्शन ई शेड्युल एरीया (पेसा) कायदा लागु आहे. या भागातील सरपंचावर केवळ सदस्यांच्या ३ चतुर्थांश बहुमताने अविश्वास प्रस्तावाने सरपंचास पायउतार करता येत नाही. १० सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीतील मतदार संख्या १६३० आहे. त्यावेळी २५ टक्के किंवा किमान १०० गणपुर्तीची अट असल्याने गावकर्‍यांच्या उपस्थीतीत होणार्‍या ग्रामसभेत थेट जनतेतुन निवडुन आलेल्या नाना बुच्या बेठेकर सरपंचाचे भविष्य ठरेल.सदर्हु  सरपंचावर फेबृृृृवारी २०२१ ला अविश्वास प्रस्ताव पारीत झाला होता पेसाच्या तरतुदीने ग्रामसभेच्या सम्मतीशिवाय प्रस्ताव सम्मत न झाल्याने सरपंचास अभय मिळाले होते. ग्रामसभेचा काय निर्णय लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

** जिल्हाधिकारी पवनित कौर यानी ग्रामसभेचा आदेश पारीत केला असुन तहसिलदार माया माने यानी आज ग्रामसभा निश्चीत केली आहे. गटशिक्षणाधिकारी एस.जी. बोडखे अध्यासी अधिकारी तर मसराम, घुगे, टोळे, गायधने, निलेश तालन यांची चमु नेमली आहे.

Previous Post Next Post