ग्रामीण कृषि कार्यक्रम अंतर्गत कृषिदूत रश्मी ढगे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद...


 संग्रामपूर ता.प्रतिनिधी:-

 शासनाच्या आदेशानुसार शेतकऱ्यास मोबाईल ई पीक पाहणी ॲप द्वारे आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतः शेतात जाऊन करायची आहे तसे न केल्यास शेतकऱ्यांच्या ७/१२उताऱ्यावरील पीकपेरा हा कोरा राहील त्यामुळे शेतकऱ्यास कोणतीही शासकीय मदत , पीक विमा पीक कर्ज व अनुदान प्राप्त होणार नाही लाभ हि घेता येणार नाही.यामुळे पि आर पोटे पाटील कृषी महाविद्यालय अमरावती येथील विद्यार्थी रश्मी सुरेंद्रा ढगे, हि शेतकऱ्या चे नुकसान होऊ नये म्हणुन स्वतः प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन ई पीक पाहणी ॲप द्वारे महिती कशी भरायची याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना दाखवत आहेत. तसेच शेतकऱ्यांना ई पीक पाहणी ॲप वापरासाठी प्रोत्साहित करत आहेत आज एकलारा गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन यांनी इ पीक पाहणी ॲप द्वारे शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती भरून घेतली व या विषयी मार्गदर्शन केले यासाठी प्रा. पी. डी . देशमुख, प्राध्यापक राहुल कळस्कर , प्राध्यापक श्वेता गावंडे यांचे मार्गदर्शन लाभले यावेळी एकलारा बानोदा येथील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Previous Post Next Post