जळगांव(जा)प्रतिनिधी:-
जळगाव जामोद बस स्थानकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत, पोलीस चौकी साठी जागा उपलब्ध नाही, पोलिसांच्या दामिनी पथकाची आवश्यकता आहे .बसस्थानकाला संरक्षण भिंती ची गरज आहे .हे सर्व प्रश्न लवकरच निकाली काढून शालेय विद्यार्थ्यांसाठी अधिक सोयी व सुरक्षा पुरवू असे आश्वासन राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला दिले. दिनांक ९ ऑक्टोबर रोजी बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश उमाळे पाटील, जिल्हा सरचिटणीस ऍड संदीप उगले, रिपाईचे युवा जिल्हाध्यक्ष प्रशांत तायडे यांनी जळगाव जामोद बस आगारातील विविध समस्या निकाली काढण्यासाठी विभागीय नियंत्रक रायलवाल यांची भेट घेतली त्यावेळी त्यांनी वरील आश्वासन दिले.जळगाव बस स्टँड मधिल सी.सी.टिव्ही कँमेरे नियमित कार्यान्वित करावे, जळगाव बस आगारला अपुऱ्या डिझल पुरवठ्याच्या आभावी लांब पल्याच्या बसेस रद्द कराव्या लागतात.तसेच अनेक बसेच जुण्या नादुरस्त व खिडखिड्या असल्यामुळे त्यातुन प्रवास करणे प्रवाशाना त्रासदायक होत आहे. तसेच जळगाव जा.आगाराकळे नेहमिच दुर्लक्ष केल्या जात आहे तेव्हा नविन व सुस्थितीत असणाऱ्या बसेस जळगाव जा.आगाराला देण्यासाठि आपन प्रयत्न करावे .यावेळी त्यानी शासन स्तरावरुन बँटरी वरील ईलेक्टाँनिक ६० बसेस ची जिल्ह्यासाठी मागणी करण्यात आली असुन त्यामधे जळगाव जा. आगाराला बसेस देण्यासाठी प्रयत्नशिल राहु असे आश्वासन राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळाला दिले .यावेळी वेळी कुषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक रमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस अँड संदीप उगले , रीपाई चे युवा जिल्हा अध्यक्ष प्रशांत तायडे ,तसेच राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वक्ता प्रशिक्षक पंजाबराव पाटिल उपस्थितीत होते.