जळगाव जामोद तालुक्यात महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद...


 जळगांव जा.प्रतिनिधी:-

लखमीपुर उत्तर प्रदेश येथे केंद्रीय राज्यमंत्री पुत्राने आपल्या गाड्यांच्या ताफ्यातील वाहनांनी आठ निष्पाप शेतकऱ्यांना चिरडून मारले,त्यावर कठोर कारवाई होण्यासाठी तसेच निगरगट्ट,शेतकरी विरोधी भाजपाच्या केंद्रातील सरकार ला झोपेतून जागे करण्यासाठी तसेच दिल्ली येथे गेल्या एक वर्षापासून शेतकरी विरोधी तीन कायदे रद्द करण्यासाठी बसलेल्या शेतकऱ्यांना जाहीर पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वतीने दिनांक ११ आक्टोंबर रोजी सोमवारला महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते.या आव्हानाला जळगांव जामोद तालुक्यातील जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वयंस्फूर्तीने बंद पाळला.तसेच सर्वपक्षीय महाविकास आघाडी तसेच शेतकरी संघटना, किसान संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री पुत्राने चिरडलेल्या निष्पाप शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख दत्ताभाऊ पाटील, उपजिल्हाप्रमुख तुकाराम काळपांडे,तालुकाप्रमुख गजानन वाघ, नगरसेवक रमेश ताडे, ख वि स संचालक संजय भुजबळ,महिला आघाडीच्या सौ माधुरीताई  राणे, सौ अरुणाताई लावरे,कृ उ बा चे माजी उपसभापती शांताराम धोटे, एकलव्य पाटील, मंगेश कतोरे, विशाल पाटील, युवराज देशमुख, रामकृष्ण  वंडाळे, लक्ष्मण ढगे, समाधान पाटील, शुभम पाटील,जाकीर खान, संकेत रहाटे,पवन वाघ,महादेव लावरे,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. प्रशांत दाभाडे, अँड संदिप उगले, बाजार समितीचे प्रशासक रमेश पाटील,अब्दुल जहीर, अजहर देशमुख,संजय देशमुख,एजाज देशमुख,शेख जावेद, ईरफान खान,सिद्धार्थ हेलोडे, आशिष वायझोड़े, दत्ता डिवरे,अतिक खान,पवन दंडे, अताउल्ला खान,शेख ताहेर,मुजाहिर मौलाना,योगेश घोपे,करीम खान,शेख जावेद, करन हेलोडे,शाकिर भाई, सैय्यद साबीर, ईमरान दौला.यासह कॉग्रेस नेत्या स्वातीताई वाकेकर,माजी जि.प.अध्यक्ष प्रकाश पाटील, तालुकाध्यक्ष अविनाश उमरकर,नगरसेवक अर्जुन घोलप,नगरसेवक अँड संदिप मानकर, नगरसेवक श्रीकृष्ण केदार,राजु घुटे,मिनाताई सातव,प्रविण देशमुख, कलीम खान,सय्यद अफ्रोरोज,शेख राजिक,जुनेद शेख यांच्यासह शेतकरी संघटना किसान संघटना व मोठ्या संख्येने शेतकरी बांधव व सर्व पक्षीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post Next Post