तुरीचे विक्रमी उत्पादन घेणारे सुनगांव येथील शेतकरी राजकुमार राजपूत यांची यशोगाथा...


 विशेष प्रतिनिधी:-

शेती म्हटल्यास न परवडणारा व्यवसाय अशीच अवस्था आज रोजी शेतकऱ्यांचे झालेले आहे निसर्गाचा लहरीपणा अतिवृष्टी कोरडा दुष्काळ ओला दुष्काळ अवकाळी पाऊस यांच्या साथीला पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्याचे पिक घरात येईपर्यंत त्याची हमी शेतकऱ्यांना राहत नाही. दिवसेंदिवस शेतीवर उत्पादन खर्चात वाढ होत असताना उत्पन्नात मात्र कमालीची घट होताना दिसत आहे त्यामुळे शेती हा व्यवसाय नफ्याचा राहिला नसून फक्त नाईलाजास्तव किंवा मजबुरीने बरेच शेतकरी शेती करताना चे चित्र आज दिसत आहे. परंतु यावर सुद्धा आज रोजी आधुनिक पीक पद्धतीने शेती केल्यास शेतीमधून मिळणारे उत्पन्न हे नक्कीच फायद्याचे ठरते. असाच एक संदेश जळगाव जामोद तालुक्यातील सुनगाव येथील शेतकरी राजकुमार राजपुत मोबाईल नंबर 9921355147 हा असुन यांनी इतर शेतकऱ्यांन समोर तूर पिकाचे विक्रमी उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला आहे. जळगाव शहरावरून सहा किलोमीटर उत्तरेस सुनगाव असून राजकुमार राजपूत उच्चशिक्षित असून त्यांच्याकडे वडिलोपार्जित पंचवीस एकर बागायती शेती असून ते काही वर्षा पूर्वी परंपरागत शेती करीत होते. परंतु त्यामधून मिळणारे उत्पन्न फार कमी प्रमाणात होत असल्याने उत्पादन खर्च सुद्धा निघणे कठीण झाले होते. दहा वर्ष अगोदर त्यांनी पूर्ण 25 एकर शेतामध्ये तूर या पिकाची लागवड केली होती या मध्ये आंतरपीक म्हणून सोयाबीन मूग उडीद हे पीक घेत असत. तूर या पिकाला उत्पादन खर्च हा कमी असल्याने त्यांना शेतीमधून दफा दिसायला सुरुवात झाली अशातच त्यांची भेट मध्यप्रदेश राज्यातील त्यांच्या एका नातेवाईकांशी झाली असता त्यांनी राजकुमार राजपुत यांना भरपूर उत्पादन देणाऱ्या तुरीच्या गजब लाल वाणाची शिफारस केली. आणि त्यानुसार राजकुमार राजपूत यांनी ह्या गजब तुरीच्या वाणाची त्यांच्या शेतात पेरणी केली वाजता आज रोजी त्यांची तूर पाहण्यासाठी लांब परिसरातून मोठ्या प्रमाणात शेतकरी येत आहेत. आज त्यांचे पीक पाहता त्यांना या तुरीच्या गजब लाल वानामुळे तुरीचे विक्रमी उत्पादन होईल एवढे मात्र निश्चित.

Previous Post Next Post