कृषी पंपाचा रात्रीचा विजपुरवठा बंद करून दिवसा 9 तास विज द्या. शेतकरी संघटनेचे सुपेश वाघ यांची महावितरणला निवेदणाद्वारे मागणी...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

कृषी पंपांचा रात्री विज पुरवठा बंद करुण दिवसा 9 तास विज द्या या मागनी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सुपेश वाघ विज कंपनी च्या कार्यालयावर गेले अनेक दिवसांपासुन शेतकय्रांना नापीकी असेल ओला दुष्काळ असेल अशा अनेक संकटांना शेतकरी तोंड देत आहे , शेतकरी आपली संध्याकाळ ची चुल पेटवायची कशी याचाच विचार करत आहे त्या करीता शेतकाय्रांनी आता उन्हाळी पिकांची तयारी सुरू केलेली आहे परंतु क्रुषी पंपांना विज रात्री असल्या कारनाने शेतकय्रांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा नेते सुपेश वाघ यांनी या विषयाकडे तात्काळ लक्ष देत आज महा वितरन कंपनी गाठली व शेतकय्रांच्या व्यथा महावितरण कंपनी समोर मांडल्या त्या वेळेस महावितरण कंपनीच्या अधीकार्यांनी यावर लवकरच तोडगा काढु व शेतकय्रांच्या समस्या लवकर निकाली काढु असे स्वाभिमानीचे युवा नेते सुपेश वाघ यांना सांगितले या वेळी सदानंद माजरे, नारायण माजरे,विजय रायपुरे,संदिप गायकी,गोपाल म्हसाळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post