हिवरखेड प्रतिनिधी:-अर्जुन खिरोडकार.
हिवरखेड चीचारी मार्गावरील शेतशिवरात गेल्या आठवड्यात रानडुकरांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पिके उदवस्त केली असून या परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकाचे सुद्धा नुकसान झाले , या मध्ये केळी, हरभरा, गहू आधी पिकाचे नुकसान केले ,तर या शेत रस्त्यावर असलेल्या नरेश जयस्वाल यांच्या शेतातील केळी या पिकाचे रानडुकरांनि बरेच नुकसान केल्या पुन्हा हे शेतकरी चिंतेत पडले, नुकसान झालेल्या पिकाची पाहणी संबंधित पटवारी यांनी करून तात्काळ नुकसान धारकांना मदत घोषित करावी अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे,
आमच्या केळी पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले , असून आम्हां शेतकऱ्यांना रात्र दिन नाहक त्रास सहन करावा लागत आहे, आम्हा नुकसान धारकांना शासनानि त्वरित मदत घोषित करावी,
उमेश जयस्वाल,
शेतकरी हिवरखेड