अंजनगाव सुर्जी तालुक्यातील सामाजिक वनीकरण कडून अनेक गावांमध्ये वृक्ष लागवडीचे कामे चालू असतात या वृक्ष लागवडीच्या जोपासने साठी सामाजिक वनीकरण विभागा कडून लाखो रुपये खर्च होत आहे.परंतु हा खर्च निवड कागदोपत्री होत असल्याचा आरोप येथील सामान्य जनतेने केला आहे या कामावर मजुरीवर असलेल्या नागरिकांनी सामाजिक नाविन्यपूर्ण योजनेचा पर्दाफाश केला असून या मध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे त्या मजुराचे म्हणणे आहे कसबेगव्हाण या ठिकाणी तीन वृक्ष लागवडीचे तिन प्लांटेशन आहे तर औरंगपुरा सैदापूर कोठा कोकर्डा निंभारी अशा ठिकाणी लहान वृक्ष प्लांटेशन असल्याचे समजते झाडांची खड्डे उखरी लागवड झाडांचा ट्रॅव्हलिंग खर्च या मध्ये टक्केवारीनुसार कमिशन घेत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.अंजनगाव सुर्जी सामाजिक वनीकरण विभाग यांच्या देख रेखी खाली तालुक्यात सर्व गावां मध्ये नरेगा या कामावर 248 मजूर कार्यरत असून नवीन ने पूर्ण सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत कामा करिता कागदावर 387 मजूर असल्याची माहिती पुढे आली आहे तर या पैकी काही मजुर आर एफ ओ यांच्या मर्जीतील विश्वासू बोगस असल्याचे तक्रारदार यांच्या सांगण्या वरून समजले आणि संबंधित आर एफ ओ यांच्याशी या संदर्भात माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी सांगितले की माझी मिटिंग असल्या मुळे मी प्रतिक्रिया देऊ शकत नाही तालुक्यात सुरू असलेल्या ठिकाणी कामा वर चे बोगस बिल शासना कडे सादर करुन काढत असल्याचे विश्वसनीय माहिती पुढे आली या बद्दल तक्रारदारांनी तक्रार केली असता या खात्यातील संबंधित वरिष्ठ अधिकार्यां पासून खालच्या अधिकाऱ्या पर्यंत दहा टक्के पाच टक्के तीन टक्के व ऑफिस मधील संबंधित टेबल बाबु पाच टक्के पैसे घेत असल्याचे ही त्यांनी सांगितले लाखो चे कामे तालुक्यातील वृक्ष लागवडीचे होत असून या मध्ये करोडो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचीही नागरिकांचे म्हणणे आहे या अधिकाऱ्यांनी 21 ऑक्टोंबर ते मार्च 21 या कालावधी मध्ये कोणतेही वृक्षाला पाणी दिले नसल्याने वृक्ष मरण अवस्थेत दिसून आले तरी सुद्धा या पाण्याचे बिल देखील लाखोच्या घरात असल्याचे मजुरांचे म्हणणे आहे या वरून हे सिद्ध होते की नक्की सामाजिक वनीकरण विभागात लाखो रुपयांची लूट होत असून शासनाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून जनसामान्य मजुराचा पैसा हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घशात तर जात आहे, असा प्रश्न आता तालुक्यातील जनतेने केला आहे.ज्या ठिकाणी वृक्ष लागवडी करिता पाच मजुराच कामा साठी लावली जातात त्या ठिकाणी शंभर मजुराचे व्हाचर काढल्या जात असल्याचेही बोलले जात आहे.या बाबत तक्रार केल्यास संबंधित मजुराला ॲट्रॉसिटी ॲक्ट केस मध्ये अठवण्याची धमकी संबंधित अधिकारी यांनी दिली असल्याचे पीडित मजुराने आमच्या प्रतिनिधी जवळ सांगितले समजते, आता जनतेने न्या कुठे मागवा हाच खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे.संबंधित सामाजिक वनीकरण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे प्रॉपर्टीची चौकशी ई डी आयकर विभागाने केल्यास भ्रष्टाचार करणारे मोठे मासे गळाला लागण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे अंजनगाव तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातच असाच घोळ मुजरा च्या नावाखाली चालू असल्याचे बोलले जात आहे.
सामाजिक वनीकरणात नाविन्यपूर्ण योजनेत लाखोचा घोळ, खोटे बिल सादर करून लाखो रुपयाची हिस्से वाटणी...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी