अतिवृष्टिने झालेल्या नुकसानीची सरसकट मदत द्या. स्वाभिमानीची मागणी...


जळगांव जा.प्रतिनिधी:-

जळगाव जामोद तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्या. अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे तहसिल मार्फत स्वाभिमानीचे ता.अध्यक्ष अंकित दाभाडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली आहे. तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी पुर्णपणे हवालदिल झाला आहे. वेळोवेळी पडलेला मुसळधार पाऊसामुळे शेकडो एकर जमिनी खरडुन गेल्या. येवढ्यावरच न थांबता पाऊस सतत सुरू राहल्याने पिकांची वाढ खुटली. वाण किळीने लाखो एकरातील सोयाबीन सारखे पिके फस्त केली. कापूस, सोयाबीन,तुर, ज्वारी, उडिद,मुंग इत्यादी पिकासह प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. या अचानकपणे आलेल्या संकटाने शेतकरी चिंताग्रस्त आहे. महागाईचा आकडा गगणाला भिडला आहे. त्यामुळे  कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नाही. आरोग्याचा खर्च, मुलांचे शिक्षण, विश्व दारिद्र्य आले असल्याने मुला मुलिचे थांबलेले लग्ण, त्यामुळे या माणसिकतेने शेतकरी खचुन गेले असल्याने या सर्व संकटाचा सामना कसा करावा हा प्रश्न शेतकऱ्यांनसमोर ठासुन उभा आहे. करीता सरकारने वेळ काढु पंचनाम्याचे थोटांग बंद करून विना विलंब शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी तसेच पिक विमा कंपन्यांनी जाचक अटी न लावता शंभर टक्के पिक विमा मंजूर करून रक्कम तत्काळ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची मागणी यावेळी केली असून आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यास टाळाटाळ झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांना सोबत घेऊन कोणत्याही क्षणी जळगाव तहसील कार्यालयासमोर स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा निवेदनातुन दिला आहे. निवेदनावर ता.अध्यक्ष अंकित दाभाडे,रुस्तम दाभाडे,सैय्यद अदनान,योगेश पाटील,शुभम दाभाडे,शेख तौशिफ यांच्या सह बहुसंख्य कार्यकर्ते शेतकरी उपस्थित होते.

Previous Post Next Post