हिवरखेड मेनरोडवरील रतीलाल गणात्रा यांच्या किराणा दुकानासमोर असलेल्या व जुन्याकाळी बांधकाम केलेला बंगला हा फारच शिकस्त झाला होता ,त्यामुळे दिनांक २५ सप्टेंबरच्या दुपारी त्या बंगल्यावरील काही भाग कोसळल्या सुरुवात झाली असतांना ही बाब तेथील व्यवसायिकांनच्या लक्षात येताच त्यांनी सतर्कता बाळगून त्या बंगल्यातुन किंमती वस्तू बाहेर काढल्या व रस्त्यावरील प्रवाशांना सावधान केले, त्यामुळे येथील अनर्थ टळला बंगल्याचा अर्धाभाग कोसळताच रहदारीत अडथळा होऊन नये म्हणून स्थानिक पोलीस स्टेंशनचे जमदार सोळंके व ग्रामपंचायत प्रभारी सरपंच यांनी घटनास्थळी जाऊन रहदारीचा मार्ग मोकळा केला,तर ज्याचा बगला कोसळला बाहेर गावाला राहत असलेल्या स, नरेशभाई अग्रवाल यांच्या कुटूंबाना माहिती देऊन बंगल्याच्या विटा मातीची विल्हेवाट ग्रामपंचायतच्या वतीने लावण्यात आला, तसेच पत्रकारांच्या व तेथील रहिवाशांनच्या समयसुचनेने हा मोठा अनर्थ टळला यापुढे असा अनर्थ होऊन नये त्या करिता ग्रामपंचायतने शिकस्त मकानधारकांना नोटीस बजाऊन सूचना द्याव्या अशी मागणी नागरिक करीत आहेत,,,,
हिवरखेड मेंन रोडवर शिकस्त बगला कोसळला...
अर्जुन खिरोडकार/हिवरखेड प्रतिनिधी...