परतीचा पाऊसाचा दणका वीज कोसळून सहा शेळ्या जागीच ठार...मेळघाटातील कारदा येथील घटना...
राजु भास्करे /अमरावती जिल्हा प्रतिनिधी
मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील कारदा गावात झाडावर वीज पडल्याने सहा शेळीच्या जागीच मृत्यू झाला. शनिवारी कारदा येथे दुपारी वाऱ्या पावसासह आकाशातून वीज कोसळून सहा शेळ्या घटनास्थळी ठार झाल्या आहे. त्यामुळे संबंधित शेळी मालक कुटुंबियापुढे उपजीविकेचा गंबीर प्रश्नन निर्माण झाला आहे. प्राप्त माहिती नुसार दुपारच्या दरम्यान अचानक आकाश दाटून वारा सुटला पाहता-पाहताच आकशातुन विजेच्या गडगडासह मेघगर्जनेसह कारदा येथे अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या दुर्दैवाने याच क्षणी आकाशातून एक लख्य प्रकाशित वीज झाडावर कोसळून तिथे आश्रय घेणाऱ्या सहा शेळ्यासाठी यमदूतरुपी काळाचा घात ठरल्या मृत्युमुखी पडलेल्या सहाही शेळ्या तुलशीराम भुरा जामुनकर रा.कारदा ता.चिखलदरा यांच्या मालकीचा असून जेव्हा हि घटना घड़ली त्यावेळी शेळी मालक तुलशीराम जामुनकर हे सुदैवाने घटना स्थळी हजर नव्हते, त्यामुळे ते सुखरूप बचावले अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. पशुपालन, शेळी पालन करणाऱ्या जामुनकर कुटुंबीयांची याच शेळ्यांचा भरवश्यावर कौटूबिक उपजीविका चालत होती पण या दुर्दैवी घटनेनंतर जामुनकर कुटुंबाना मृत शेळ्याअभावी मोठे नुकसान झाले असून जगण्याचा एकमेव आधार खचला आहे. अश्या विपरीत परिस्थितीवर मात करण्याची आपतग्रस्त कुटुंबियांना तात्काळ महसूल खात्याकडून नैसर्गिक आपत्ती अंतर्गत सानुग्रहाची मिळणारी मदतीची आर्थिक रक्कम मिळावी. महसूल मंडळ तलाठीतर्फे घटनास्थळी पोहचून पंचनामा करणे आवश्यक आहे. जेणेकरून संबंधित नुकशानग्रस्त कुटूंबाला लवकरात लवकर नुकशान भरपाई मिळणार आणि जामुनकर कुटुंबाला मदत होईल, तुलशीराम जामुनकर याला लवकरात लवकर महसूल खात्यांतर्गत मिळणार नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तातडीने मदत मिळावी अशी मागणी गावातील सरपंच सोनाजी सावलकर,पोलीस पाटील आर.एस. भूसुम, यांनी केली आहे.सदर घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी गाठून येवले तलाठी यांनी पंचनामा केला आहे. पंचनामा करतांना सोनाजी सावलकर सरपंच,आर.एस. भूसुम पोलीस पाटील,रामा धिकार रोजगार सेवक व गावकरी उपस्थित होते.
