संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे तात्काळ मानधन द्या वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी...


 
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे तात्काळ मानधन द्या वंचित बहुजन युवा आघाडीची मागणी...

जळगांव जामोद प्रतिनिधी:- 

जळगाव जामोद तालुक्यातील वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने संजय गांधी व श्रावण बाळ योजनेच्या लाभार्थ्यांना तात्काळ मानधन देण्यात यावे या मागणीसाठी जळगाव जामोद तहसीलदार  यांना निवेदन देण्यात आले. संजय गांधी , श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना  मानधन मिळाले नाही.यामुळे या योजनेतील लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. शासनाने गरीब गरजू कुटुंबातील निराधारांना आधार मिळावा म्हणून ही योजना सुरू केलेली आहे परंतु गेल्या पाच महिन्यापासून  विधवा, अपंग, वयोवृद्ध, निराधारांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात त्यामुळे त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याकरिता शासनाने तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये त्यांचे मानधन जमा करावे  तसेच शेतकरी बांधवांचे रखडलेले अतिवृष्टी आर्थिक साणुग्रह निधी सुद्धा आजपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळालेला नाही त्यामुळे वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ त्यांच्या बँक खात्यामध्ये रखडलेला निधी त्वरित जमा करण्यात यावा अशा आशयाचे निवेदन दिनांक ०५ मे रोजी वंचित आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना देण्यात आले . सदर निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक अनिल रणीत, युवा आघाडीचे पदाधिकारी संतोष पवार, अमोल तायडे, बाबुराव इंगळे, महिला आघाडीच्या पार्वताबाई इंगळे, रोशन तायडे, राहुल धुंदाळेसह अनेक वंचित बहुजन आघाडीचे युवा कार्यकर्त्ये यावेळी उपस्थित होते.

Previous Post Next Post