गैरव्यवहार केलेल्या प्रकरणी शासकीय जमीन सरकार जमा..देविदास तायडे यांनी केलेल्या तक्रारीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल...
जळगाव जामोद प्रतिनिधी...
जळगाव जामोद शेत शिवारातील वायाळ शिवारातील ई क्लास जमिनीवर प्लॉटिंग पाडून अवैधरित्या प्लॉटची विक्री रफिक शहा यांनी केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून जमीन सरकार जमा करण्यात यावी अशी मागणी देविदास तायडे यांनी तहसीलदारांकडे केली दाखल तक्रारीनुसार, भूमिधारी सिताबाई रामदास जाधव रा. वडशिंगी यांना वायाळ शिवारात शासकीय ई क्लास १३ हेक्टर ९३ आर जमीन पैकी २ हेक्टर शेत जमीन अटी व शर्तीच्या नियमाने पट्टा तहसीलदार यांनी प्रदान केला होता. नियमानुसार ही शेती दुसऱ्याला वहितीसाठी देता येत नाही. गहाण ठेवू नये, विकूनये, हस्तांतरीत करु नये, असे अतिक्रमण नियमाकुल करताना तहसीलदार यांनी पट्टा प्रदान करताना नियम व अटी लावल्या होत्या. परंतु, सीताबाई जाधव यांनी रफिक शाह रहेमान शाह रा. जळगाव जामोद यांना १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ९९ वर्षांचा भाडेपट्यावर जमीन दिली होती तक्रारीची दखल तहसीलदार यांनी घेवुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले त्या मध्ये तक्रारदार लाभार्थी व विनापरवानी प्लाट पाडुन विक्री करणारा यांचे म्हणणे व कागदपत्रे तपासून जमीन शर्तभंग झाल्याने तहसीलदार यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कडे वर्ग केले उपविभागीय अधिकारी यांनी सदर प्रकरण शंर्तभंग अहवाल जिल्हाधिकारी यांना पाठवला जिल्हाधिकारी या प्रकरणाची सुनावणी ३ जुन ला घेवुन जमीनचा गैरव्यवहार झाल्याने सरकार जमा करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले....
--प्रकरण--
नैसर्गिक न्यायतत्वाचे सिध्दांतानुसार अर्जदार यांचे, म्हणने ऐकुन घेण्यासाठी दिनांक २६ मे, २०२५ रोजी नोटीस काढून दिनांक ३ जून, २०२५ रोजी त्यांची बाजू मांडण्याची संधी देण्यात आली. तथापी अर्जदार किंवा त्या विधिज्ञ त्यांची बाजु म्हणने मांडणेसाठी या कार्यालयाकडे हजर झाले नाहीत यावरुन त्यांना काही सांगावयाचे नाही असे गृहीत धरण्यात येत आहे.उपविभागीय अधिकारी, जळगांव जामोद यांनी सादर केलेल्या प्रकरणातील दस्तावेजांचे अवलोकन केले असता सदर जमीन वाटप आदेशाती अटी खालील प्रमाणे आहेत.अतिक्रमकाने महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ४३ (१) (अ) मधील क्रमांक (४) (५) (६) खालील निर्देशित केलेल्या शर्तीला बाध्य राहील. सदरहू शेती दुसऱ्या व्यक्तीला वहितीसाठी देता येणार नाही.अतिक्रमकाने जिल्हाधिकारी यांचे पूर्व मंजूरी शिवाय सदरहू जमीन किंवा जमिनीचा, कोणताही भाग गहाण ठेवू नये. अभिहस्तांकित किंव हस्तांतरीत करु नये.अतिक्रमक वर निर्देशित केलेल्या शर्तीचा भंग करीत असेल तर कि. जिल्हाधिकाऱ्यानी दिलेली उक्त जमीन परत घेण्यात येईल. आणि अतिक्रामकाचा जमीनीवरील ताबा काढून घेण्यात येईल.सदर जमिन आज रोजी रफिक शहा रहेमान शहा रा. जळगांव जामोद हे वहिती करीत असून ९९ वर्षाच्या भाडेपट्ट्यावर केल्याचे समजते.मोका पाहणी दरम्यान सदरहु व्यक्तीने अन्य व्यक्तींना भूखंड पाडून विक्री केल्याचे आढळून आले.सिताबाई रामदास जाधव यांनी दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी रुपर १००/- चे स्टॅप पेपरवर रफीकशाहा रहेमानशाहा रा. जळगांव जामोद याचे समवेत मौ. वायाळ येथील गट नं. १९२ मधील हिस्सा २.०० हे. आर जमीनीचा ९९ वर्षाचा भाडेपट्टा तसेच विक्रीचा करारनामा केलेला आहे.रा.प्र.क्र.एम.आर.सी.-८१/वायाळ / १५४/२०२४-२५ अतिक्रमकाने जिल्हाधिकारी यांचे पूर्व मंजूरी शिवाय सदरहु जमीन किंवा जमिनीचा कोणताही भाग गहाण ठेवू नये. अभिहस्तांकित किंवा हस्तांतरीत करु नये ही अट लादण्यात आली असून अर्जदार श्रीमती सिताबाई रामदास जाधव, रा. वडशिंगी ता. जळगांव जामोद यांनी दिनांक ८ जानेवारी, २०१५ रोजी रुपये १००/- चे स्टॅप पेपरवर रफीकशाहा रहेमानशाहा रा. जळगांव जामोद यांचे समवेत मौ. वायाळ येथील गट नं. १९२ मधील हिस्सा २.०० हे आर जमीनीचा ९९ वर्षाचा भाडेपट्टा तसेच विक्रीचा करारनामा केलेला आहे.अर्जदार त्यांना वाटप केलेल्या मौ. वायाळ येथील गट नं. १९२ मधी २.०० हे.आर. भोगवटादार वर्ग-२ जमीनीच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्याचे स्पष्ट होत असून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येत आहे.
--आदेश --
अर्जदार श्रीमती सिताबाई रामदास जाधव, रा. वडशिंगी ता. जळगांग जामोद यांनी त्यांना वाटप केलेल्या मौ. वायाळ येथील गट नं. १९२ मधील २.०० हे.आर. भोगवटादार वर्ग-२ जमीनीच्या अटी व शर्तीचा भंग केला असल्याचे महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमिनीची विल्हेवाट लावणे) नियम, १९७१ चे नियम १५ नुसार सदर जमीन शासन जमा करण्यात येत आहे.तहसिलदार, जळगांव जामोद यांनी सदर जमीन शासनाचे ताब्यात राहील याची दक्षता घ्यावी.अर्जदार हे महाराष्ट्र जमीन महसूल (सरकारी जमीनीची विल्हेवाट लावणे) नियम १९७१ चे नियम ४३(१) (अ) मधील क्रमांक (४) (५) (६) खालीत निर्देशित केलेल्या शर्तीला बाध्य असतांना सदर शेती दुसऱ्या व्यक्तीला वहितीसाठी दिली असल्याचे स्पष्ट होते यावरून जिल्हा अधिकारी डॉ किरण पाटील यांनी आदेश दिले.( दुय्यम निबंधक व रफिक शहा यांनी संगनमताने प्लाट दस्त नोंदणी केली होती यांच्यावर गुन्हे दाखल करा अशी मागणी सुध्दा तहसीलदार यांचे कडे देविदास तायडे यांनी केली