मेळघाटातील दहावी पास झालेले मुले मुली चे भवितव्य अंधारात...


 
💥मेळघाटातील दहावी पास झालेले मुले मुली चे भवितव्य अंधारात...

राजु भास्करे/अमरावती जिल्हा प्रतिनिधी...

नुकताच पास झालेले बारावी, दहावी च्या विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात प्रवेश घेण्यासाठी शिक्षण विभागाने रजिस्ट्रेशन करण्याकरीता आदेश दिले आहेत.परंतु या आदेशाने मेळघाटातील आदिवासी बांधव व इतर लोकांनी  नाराजी व्यक्त केली जात आहे.बोलले जात आहे मेळघाटात आदिवासी जास्त असुन जे धोरण शिक्षण विभागाने रजिस्ट्रेशन करण्याकरीता आखले असुन हे धोरण मेळघाटात नको असायला पाहिजे होती.असे म्हणणे मेळघाटातील पालक वर्गाचे दिसुन येत आहे.तसेच या धोरणामुळे मेळघाटातील पुष्कळ सारे विद्यार्थ्यांना टक्के वारी नुसार शिक्षणापासून वंचित राहावावे लागणार आहे.त्या करीता मेळघाटातील विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन ची अंट शिथिल करुन त्या विद्यार्थ्याला शाळेत प्रवेश देण्यात यावे अशी मागणी मेळघाटात जोर धरत आहे.तसेच  शिक्षण विभागाने दहावी पास झालेले विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी रजिस्ट्रेशन करणे आवश्यक असुन आणि कमि पडलेले  टक्के वारी विद्यार्थ्यांचे शाळेत शिक्षणासाठी नंबर नाही लागले तर त्यांचा काय होणार?हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.त्या करीता मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी मेळघाटातील आदिवासी संघटनाने जागृत होणे गरजे समजले जाते.अन्यथा मेळघाटातील  विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Previous Post Next Post