सामुहिक विवाह सोहळ्याचा रखडलेला निधी मिळण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा...


सामुहिक विवाह सोहळ्याचा रखडलेला निधी मिळण्यासाठी आमरण उपोषणाचा इशारा...

जळगांव जामोद प्रतिनिधी:-

जळगांव जामोद तालुक्यातील ग्राम जामोद येथे सन २०२३ मध्ये ५१ जोडप्यांचा बौद्ध धम्मीय सामुहिक विवाह सोहळा पार पडला होता परंतु संपूर्ण दोन वर्षाचा कालावधी उलटला असून आजपावेतो या सोहळ्यातील वधु पित्यांना समाज कल्याण विभागामार्फत मिळणारा निधी वधु पित्याच्या बँक अकाउंट मध्ये जमा झाला नाही याकरिता जळगाव जामोद तालुका तक्षशिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा पार्वताबाई मुकुंदराव इंगळे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिनांक सहा जुन रोजी निवेदन दिले या निवेदना नमूद केले आहे की समाज कल्याण विभागाअंतर्गत होते त्यांना कन्यादान योजनेअंतर्गत लाभ दिला जातो तो लाभ गेल्या दोन वर्षापासून अद्याप पर्यंत मिळाला नाही वेळोवेळी तोंडी व लेखी स्वरूपात संबंधित विभागाला भेटून सुद्धा काही एक उपयोग न झाल्याने अखेर संस्थेचे अध्यक्ष पार्वताबाई इंगळे यांनी शासनाला उपोषणाचा इशारा दिला आहे..

Previous Post Next Post